Special marriage ceremony that took place in Yavatmal 
विदर्भ

एका लग्नाच्या तारखा तीन, आई-वडिलांना सोडून वधू दुचाकीने निघाली एकटी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना विषाणूने देशात शिरकाव केल्याने भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशात 21 दिवसांचा लाऊकडाऊन सुरू आहे. या काळात लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम, होम-हवण अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. मात्र, ज्यांचे लग्न आगोदरच ठरले असेल त्यांचे काय?, असाच एक विवाह सोहळा कोरोना येण्यापूर्वीच ठरला होता. मात्र, तो होऊन शकला नाही. यामुळे संतप्त वधूने हा निर्णय घेतला... 

यवतमाळ शहरातील नामवंत परिसरात राहणाऱ्या युवतीचा विवाह बाबुळगाव तालुक्‍यातील युवकाशी ठरला. साक्षगंधाचा कार्यक्रम नामवंत कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला. तसेच त्यांचा विवाह नऊ मार्चला नियोजित करण्यात आला. दोघेही भावी जीवनाचे स्वप्न रंगवू लागले. भेटीगाठी होऊ लागल्या. दुसरीकडे मुला-मुलींच्या कुटुंबीयांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली. लग्नपत्रिकाही छापल्या. घरात आनंदाचे वातावरण होते. 

लग्नाची तारीख जवळ आली तितक्‍यात कोरोना विषाणूने देशात प्रवेश केला. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. अशा परिस्थितीत कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी नऊ मार्चला होणारा विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होईल आणि स्थिती सामान्य होईल या आशेवर 31 मार्चचा मुहूर्त काढला. 

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 31 मार्चलासुद्धा विवाह करणे शक्‍य झाले नाही. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाले. ही परिस्थिती कधी संपेल याची काहीही श्‍वाश्‍वती नसल्याने लग्न कधी करायचे असा प्रश्‍न दोन्ही कुटुंबीयांना पडला. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे वारंवार विवाह पुढे ढकलले योग्य नाही. पाहुणे मंडळी नाही जमली तरी चालेल. चार लोकांत तीन एप्रिलला विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला. मात्र, तेही शक्‍य न झाल्याने मुलीने थेट दुचाकीने मुलाचे घर गाठून लग्न केले. 

प्रशासनाने नाकारली परवानगी

दोन्ही कुटुंबीयांनी घरच्या घरी लग्न करण्याचे ठरवले. यानंतर मुलीचे लग्न मुलाच्या घरी करण्यासाठी मुलीच्या मंडळींनी प्रशासनाला कार घेऊन जाण्याची परवानगी मागितली. मात्र, ती वेळेपर्यंत मिळाली नाही. आता काय करावं, असा प्रश्‍न मुलीच्या कुटुंबीयांना पडला. मग काय मुलीने वधूच्या वेशेत चक्‍क दुचाकीने वीस किलोमीटर अंतर पार करीत मुलाच्या घरी हजेली लावली. सायंकाळी मोजक्‍या चार लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. 

मुलीचे आई-वडील अनुपस्थित

लग्नासाठी मुलीने दुचाकीने वीस किलोमीटरचे अंतर पार करीत मुलाचे घर गाठले. यावेळी मोजक्‍या चार पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आटोपण्यात आला. नवरदेवाच्या घरीच अंतरपाट करून लग्न झाले. मात्र, येवढ्या मोठ्या सोहळ्याला मुलीचे आई-वडील सोबत नव्हते. संचारबंदीमुळे असा विवाह करण्याची वेळ दोन्ही कुटुंबावर आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT