toilet constructions still not complete in yavatmal
toilet constructions still not complete in yavatmal 
विदर्भ

यवतमाळमधील हागणदारीमुक्ती कागदावरच, दीड हजारापेक्षा अधिक शौचालयांचे काम अपूर्ण

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे, असे असले तरीदेखील नव्याने तब्बल दोन हजारांवर नागरिकांकडे शौचालये नसल्याची बाब नुकत्याच घेण्यात आलेल्या नोंदीत समोर आली आहे. सध्या 47 हजारांवर शौचालयांचे काम पूर्ण झाले असून, दीड हजारांवर शौचालये अपूर्ण आहेत. 

प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे, यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी तसे निर्देशही देण्यात आलेले आहेत. निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण 48 हजार 597 नागरिकांकडे शौचालये नव्हती. अशापरिस्थितीत शौचालयांचे बांधकाम मिशन मोडवर घेण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 59 शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले. आणखी एक हजार 538 शौचालयांचे बांधकाम अपूर्ण आहेत. येत्या काळात हे बांधकाम पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशातच शासनाने शौचालय नसलेल्यांच्या नव्याने नोंदी घ्याव्यात, असे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार आतापर्यंत दोन हजारांवर शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यात आर्णी तालुक्‍यात 192, बाभूळगाव 161, दारव्हा 233, दिग्रस 31, घाटंजी 13, कळंब 27, केळापूर 124, महागाव 10, मारेगाव 297, नेर 33, पुसद 177, उमरखेड 183, वणी 52, यवतमाळ 125, झरी जामणी 132 आदी लाभार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. येत्या काळातही सर्व्हे सुरू राहणार असून, आणखी शौचालय नसलेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

शौचालय नसलेल्यांची संख्या वाढतेय -
विशेष म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्याचा राज्यस्तरावर सत्कार करण्यात आला होता. त्यामुळे नव्याने लाभार्थ्यांची संख्या राहणार नाही, असे दिसून येत होते. मात्र, नवीन लाभार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी समोर येत असल्याचे दिसून येत आहे. 

अनेक गावांमधील शौचालयांचा वापर नाही -
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. असे असले तरी शौचालयांचा वापर होत नसल्याची स्थिती समोर येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरीभागातही ही संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे केवळ कागदावर आकड्यांचा खेळ झाला का, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT