water scarcity issue in achalpur of amravati
water scarcity issue in achalpur of amravati 
विदर्भ

मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा, आदिवासी बांधवांची डोंगरदऱ्यांमध्ये पाण्यासाठी भटकंती

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : उन्हाळा जेमतेम सुरू झाला. अशातच मेळघाटात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. सध्या मेळघाटमधील बहुतांशी गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना न करता तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना राबविण्यात येत असल्याने आदिवासी बांधवांना डोंगरदऱ्यांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

उन्हाळा सुरू होताच मेळघाटातील एकझिरा गावासह बहुतांश गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी जेमतेम उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले. चिखलदरा तालुक्‍यात चंद्रभागा आणि शहानूर ही दोन धरणे आहेत. यापैकी चंद्रभागा धरणातून अचलपूर, परतवाडा तर शहानूर धरणातून अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ज्या तालुक्‍यात धरण आहे तेथील जनता मात्र पाण्यासाठी लाहीलाही होताना दिसून येत आहे. ज्या जनतेच्या जमिनी या धरणात गेल्या ती जनता मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करते. मेळघाटात दरवर्षी चांगला पाऊस पडतो, तरीसुद्धा मेळघाटला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पाणीटंचाईवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढण्यास तयार नाही. कायमस्वरूपी तोडगा काढल्यास दरवर्षी आर्थिक फायदा होणार नाही, यासाठी तर तोडगा काढत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरवर्षी मेळघाटात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करण्यात येते. त्यावर खर्चसुद्धा करण्यात येतो. त्यानंतर परिस्थिती जैसे थे होते. प्रशासनाने आजचा विचार करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल, यावर मंथन करावे, असे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. 

कायमचा तोडगा शक्‍य -
चिखलदरा तालुक्‍यातील चंद्रभागा व शहानूर या दोन्ही धरणांवरून चार ते पाच शहरांना पाणीपुरवठा केला जातो, तर मेळघाटातील गावांना या धरणांवरून पाणीपुरवठा करण्यास अडचण काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ज्या तालुक्‍यात धरणे आहेत त्या तालुक्‍यातील जनता पाण्याविना अन्‌ ज्यांच्या जमिनी गेल्या नाहीत त्यांना पाणीपुरवठा होतो, हे आश्‍चर्यच आहे. यावर उपाय म्हणून मेळघाटातील ज्या गावांत दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते, अशा गावांसाठी कायमस्वरूपी पाइपलाइन टाकल्यास पाणीटंचाईला आळा बसू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT