water supply by 11 tanker in yavatmal 
विदर्भ

यवतमाळमध्ये पाणीटंचाईच्या झळा, ११ टँकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात टंचाईने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 गावांना 11 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 13 गावात पाणीपुरवठ्यासाठी 13 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे अजून तरी टंचाईने डोके वर काढलेले नाही. मात्र, जसजसा उन्हाळा तापणार तसतसे टंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई असते. या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदा पहिला टप्पा निरंक आहे. दुसरा टप्प्यात जानेवारी ते मार्च या दरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सुरुवात झाली आहे. पुसद तालुक्‍यातील नऊ, आर्णी व यवतमाळ तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावात टँकर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या 16 हजार 438 नागरिकांची तहान भागविली जात आहे. 18 फेऱ्यांनी नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. 

तिसरा व महत्त्वाचा टप्पा एप्रिल ते जून यादरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 172 गावांचा समावेश आहे. त्यातील दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात तीन टॅंकर वाढले आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 453 गावांना टंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या गावांसाठी 453 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, दोन कोटी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा 589 गावांत पाणीटंचाईची शक्‍यता आहे. यासाठी 636 उपाययोजना राबविण्यात येणार असून, सात कोटी 80 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उपाययोजनामध्ये विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे, टॅंकर आदींचा समावेश आहे.

सध्या 13 गावांत विहिरींचे अधिग्रहण - 
जिल्ह्यात सात कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात खासगी विहीर अधिग्रहणाची संख्या अधिक आहे. सध्या 13 गावांत पाणीपुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. पुसद, उमरखेड, वणी व यवतमाळ तालुक्‍यांत या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, 17 हजार 419 नागरिकांची तहान त्यावरून भागविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT