youth died in beaten by guard at mangul sugar factory in yavatmal 
विदर्भ

कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू

सूरज पाटील

यवतमाळ : साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाने फायबर काठीने मारहाण केली. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.28) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मांगुळ साखर कारखाना येथे घडली.

शंकर मोहन आडे (वय 23, रा. सुकळी, ता. उमरखेड), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी संशयित सुरक्षारक्षक शालिक कुमरे (वय 35, रा. मांगुळ कारखाना) याला ताब्यात घेतले. शंकर हा त्याचा मित्र पवन चव्हाण (वय 20,रा. पार्डी) याच्यासह साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी गेला होता. कारखान्यात जाण्यास मनाई करीत सुरक्षा रक्षकाने तरुणाला फायबर काठीने पोटावर, छातीवर, पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पवन चव्हाण याने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित शालिक कुमरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करीत अटक केली. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

घटनाक्रम 'सीसीटीव्ही'त कैद -
तरुणाला मारहाण झाल्याचा घटनाक्रम साखर कारखान्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांनी कारखान्यात नेला. त्यामुळे तेथे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार करेवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून नातेवाइकांची समजूत काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT