World Agri Tourism Day: महाराष्ट्रात 229 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे; शेतीसोबत आधुनिकतेची कास

सध्या महाराष्ट्रात 229 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे आहेत.
World Agri Tourism Day
World Agri Tourism DaySakal

World Agri Tourism Day: १६ मे हा दिवस "जागतिक कृषी पर्यटन दिन" म्हणून जगभरात साजरा केला जातो. आज पंधरावा जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. भारत देशात महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे पहिले राज्य आहे. यानिमित्त मुंबईत महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद 2022 आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात युवा शेतकऱ्यांनी सुरु केली कृषी पर्यटन केंद्रे-

अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्यांचं प्रमाण मोठे आहे. कृषी पर्यटन केंद्रातील आर्थिक तसेच व्यावसायिक संधी ओळखून अनेक युवा शेतकरी हा मार्ग निवडत असल्याचं दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्राच्या 29 जिल्ह्यांमध्ये 229 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे आहेत. कृषी आणि ग्रामीण पर्यटन चळवळ 528 कृषी पर्यटन केंद्रापर्यंत गेली आहे.

World Agri Tourism Day
करिअर अपडेट : कृषी पर्यटन : संस्कृतीला रोजगाराची जोड

लाखो पर्यटकांची कृषी पर्यटन केद्रांना भेट-

2018-19 या सर्व कृषी पर्यटन केंद्रावरती चार लाख कृषी पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत त्यापैकी जवळजवळ चौतीस कोटी रुपयांचे उत्पन्न या पाचशेहून जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात एकूण कृषी पर्यटन केंद्रावर ती 4,167 विदेशी पर्यटकांनी भेट दिलेली आहे.

सध्याचे साधारण सत्तर टक्के शेतकरी हे पदवीधर आहेत. 20 टक्केच पर्यंत शेतकरी जे आहेत ते शिकलेले नसले तरी व्यावहारिक ज्ञान खूप आहे. अनेक कृषी पर्यटन केंद्र चालक हा उच्चशिक्षित असल्यामुळे ते विविध प्रयोग करून पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

World Agri Tourism Day
जळगाव : जिल्ह्यात कृषी पर्यटनाला चांगले भविष्य

कृषी पर्यटन केंद्र कोण सुरु करू शकते?

छोट्यातला छोटा शेतकरी असेल किंवा मोठ्यातला मोठा कृषी विद्यापीठ असेल या सर्वांना आता कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करता येऊ शकतात. त्याच्यामधून पर्यावरणाचे जतन संवर्धन होत आहे कृषी संस्कृतीचे जतन संवर्धन होतय शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे मग महिला बचत गटांचे पदार्थ असतील गावातील कारागिरांनी केलेले पदार्थ असतील असे व्यापक दृष्टिकोन ठेवून कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचे महत्त्व हे आज चांगल्यापैकी वाढताना दिसत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com