मुंबई : केंद्र सरकारकडून आलेले 40 हजार कोटी परत करण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापनेचं नाटक केल्याचा आरोप झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत आहेत. भाजप चे माजी आमदार अनिल गोटे यांनी फडणवीस यांच्यावर 46 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.
या संदर्भात गोटे यांनी आपल्या अधिकृत लेटर हेडवर एक प्रत्रक प्रसिद्धीस दिले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून, समृद्दी कॉरिडॉरची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी किती पारदर्शक कारभार केला हे जाणून घेण्याचा महाराष्ट्राला अधिकार आहे. राज्यातील 46 हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महमार्गाच्या 'पारदर्शक कारभाराची' आर पार चौकशी करा आणि त्यानंतरच राधेश्याम मोपलवार हे प्रकरण नेमकं काय आहे?, महाराष्ट्राच्या जनतेला समजले, असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय.
अनिल गोटे यांचे गंभीर आरोप
कोण आहेत अनिल गोटे?
अनिल गोटे हे भाजपचे धुळे शहर मतदारसंघाचे दोनवेळा (2009, 2014) आमदार होते. तेलगी स्टॅम्प गैरव्यवहारात अनिल गोटे यांचे नाव आले होते. त्यांना 2003मध्ये अटक झाली आणि त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर 2007मध्ये ते जामिनावर सुटले. त्यानंतर निवडणूक लढवून ते 2009मध्ये धुळ्याचे आमदार झाले. राज्यात 105 जागांवर भाजपला विजय मिळाल्यानंतर, अनिल गोटे यांनी खुले पत्र लिहून, फडणवीस यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.