मुंबई : भविष्यातील अकारण बदनामी टाळण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह प्रत्येक मंत्री कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांना तपासून-पारखून घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा पोलिस अहवाल पाहूनच त्यांना मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालय, तसेच मंत्री कार्यालयात सेवेसाठी संधी देण्यात येणार असल्याचे धोरण तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आखले आहे.
धक्कादायक मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू
शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाआघाडीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. हे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे तीन पक्षात समन्वय साधत कारभाराचा गाढा हाकणे एक आव्हान आहे. त्यातच सुमारे 105 जागा जिंकून सत्तेची संधी हुकलेला भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष आहे.
हे सुद्धा वाचा 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?
अशा विरोधी पक्षाला कोणतीच संधी न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सक्षम आणि वादग्रस्त व्यक्तिमत्वाचे असता कामा नये, असे या तीन पक्षाच्या धुरिणांना वाटते. यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांची पुर्वपिठीका तपासली जाणार आहे. तसेच संबंधित अधिका-यावर जर भाजपच्या मंत्रयांकडे काम केले असेल तसेच त्याच्यावर भाजपच्या मंत्र्यांचा अगर भाजपच्या नेत्यांचा शिक्का बसला असले अशांनाही दूर केले जाणार आहे.
हे वाचलेय का.. 1 लाखाची बांगडी पोलिसांनी शोधली!
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह मंत्री कार्यालयातील कर्मचारीवर्ग सक्षम आणि प्रामाणिक असावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री यांची बैठक बोलावली होती. चांगले काम करा, बदल्यांची प्रकरणे योग्य रीतीने हाताळा, आघाडीच्या काळात सरकार या कारणावरून बदनाम झाले होते आणि त्याचा फटका पक्षाला बसला, असे बैठकीत सांगत कर्मचाऱ्यांना पारखून घेण्याचा सल्ला देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयासह इतर मंत्र्यांना याबाबत सक्त आदेशच दिल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाची बातमी राज्यातील अनधिकृत स्कूल व्हॅन बस आरटीओच्या रडारवर
इच्छुक अधिकाऱ्यांची तपासणी होणार
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालयासह मंत्री कार्यालयात काम करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या या अधिका-यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत का? लाच घेताना ते पकडले आहेत का? त्यांच्यावर विनयभंग, लाचखोरी, दप्तरदिरंगाई आदी स्वरूपाच्या काही तक्रारी आहेत का? तसेच या अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल कसा आहे? त्यांना कधी काळी निलंबित केले होते का? तसेच त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे का? त्यांची चारित्र्य पडताळणी कशी आहे? आदी माहिती गोपनिय पद्धतीने गोळा केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना या कार्यालयात रुजू होणयासाठी परवानगी दिली जाणार आहे.
The officer will final after see the police report
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.