गेल्या पाच-सहा वर्षांपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची व्यथा या रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांना रोज अनुभवाला मिळते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारल्यानंतर पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करणे ही वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे अपघातात होणारे मृत्यू हे दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी अडीच-तीन तासांत होणार हा प्रवास आता पाच ते सहा तास लागले तरी संपत नाही. घाटात जर अपघात झाला तर मग या कोंडीतच चार -पाच तास जातात. त्यामुळे या ‘ एक्स्प्रेसवे’ची वाहतूक कोंडी कधी सुटणार हा प्रश्न आता पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना भेडसावत आहे.
सर्वात जास्त कुठे आणि कोणत्या वेळेत वाहतूक कोंडी होतात?
पुण्याहून मुंबईला निघाल्यावर पहिल्यांदा कोंडी होणारे ठिकाण म्हणजे उर्से टोल नाका. त्यानंतर लोणावळा व खंडाळा घाट, आडोशीचा बोगदा, मग खालापूर टोल नाका. या ठिकाणी कोंडी झाली तर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईहून पुण्याला येताना खालापूर टोल नाका, लोणावळ्याहून बाहेर पडताना ‘बॉटल नेक’ तयार होतो ते ठिकाण, अमृतांजन पूल आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी नियमित होते.
पुण्याहून निघाल्यावर उर्सेजवळ सकाळी ७ ते ९ , खालापूरजवळ सकाळी १० ते ११ तर मुंबईहून निघाल्यावर दुपारी ५ ते रात्री १० या वेळेत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते.
या मार्गावर रोज किती वाहने धावतात?
पोलिसांचा अंदाजानुसार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ६० हजार दररोज दुतर्फा धावणारी वाहने तर ८० ते ९० हजार शनिवारी-रविवारी धावणारी वाहने धावतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.