वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण, झपाट्याने होणारी वृक्षतोड आणि त्यामुळे झालेला हवामानबदल, जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदल रोखण्यासाठी गतवर्षी केंद्र सरकारने सुरू केलेले हरित भारत अभियान दि. 26 एप्रिल 2016 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या राज्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील वन विकास यंत्रणेची स्थापना करण्यात आली. या अभियानांतर्गत देशात पुढील दहा वर्षांत वनक्षेत्र 50 लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असून राज्याची उद्दिष्टे ठरविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे.
वनांवर अवलंबून असणाऱ्या जीवांची उपजीविका आणि संरक्षिततेसाठी वनांचे संरक्षण, विकास, संवर्धन आणि शास्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनातून हवामान बदलांचे परिणाम कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान सध्या वन आणि पर्यावरण विभागापुढे आहे, यासाठी केंद्राने हवामानबदलावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये हरित भारत अभियानाचा समावेश आहे. हे अभियान राष्ट्रीयबरोबरच राज्य, जिल्हा, शहर आणि गावपातळीवर राबविण्यात येणार आहे. राज्य पातळीवर मुख्यमंत्री, जिल्हापातळीवर पालकमंत्री, गावपातळीवर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचे प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपातळीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इतर चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
हरित भारत अभियानाचा उद्देश आणि उद्दिष्ट्ये :
अभियानाचे राष्ट्रीय लक्ष्य
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.