Akola Marathi News- Police reconciled the relationship 
अकोला

पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

सिद्धार्थ वाहुरवाघ

अकोला :  विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटनेतील कुटुंबाचा संसार उद्‍ध्वस्त होऊ नये यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि कधी काळी एकमेकांचे वैरी समजणारे कुटुंब एकत्र होऊन यापुढे वाद न घालण्याची ग्वाही देऊन हसत मुखाने घरी परत गेले.

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाभूळगाव येथील सुगरा प्रवीण मन्सूर अली (वय ३०) यांचा विवाह वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील रहिवासी व्यक्तीसोबत झाला. विवाहानंतर त्यांना दोन सुंदर मुलं झाली.

परंतु, गत सहा महिन्यापासून दोघांचे पटत नसल्याने दोघेही वेगवेगळे राहू लागले. दुसऱ्या प्रकरणातील शिवणी येथील संध्या पाटेकर यांचा विवाह नाशिक येथील व्यक्तीसोबत झाला त्यांनादेखील दोन आपत्य आहेत. त्यांच्या सुद्धा काही कारणाने वाद झाला आणि, गत दोन वर्षांपासून त्या देखील पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. दोन्ही प्रकरणातील कुटुंबातील सुज्ञ व्यक्तींनी तडजोड न करता पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली.

परंतु, वाद मिटविण्याच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी त्यांना आपसात समजोता करण्याच्या उद्देशाने ‘भरोसा’ सेल येथे तक्रार दाखल करून वाद तिथेच संपवून पुन्हा संसार थाटण्यासाठी दोन्ही प्रकरणातील महिला व त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्यात आले. परंतु, वाद मिटण्याचे नाव घेत नसल्याने ‘भरोसा सेल’ यांनी गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रकरण एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाठविले.

दोन्ही प्रकरणातील महिला आपल्या आई-वडील व इतर नातेवाईकांना सोबत घेऊन पोलिस स्टेशनला आल्या. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस स्टेशनचे ठाणेदारांनी दोन्ही महिलेंच्या सासरकडील मंडळीला पोलिस स्टेशनला बोलाऊन घेतले आणि, प्रकरण बारकाईने हातळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबातील सुज्ञ व्यक्ती आणि सदर पती-पत्नीला व्यवस्थीत समजावून सांगितले. दोन्ही महिला त्यांचे पती व कुटुंबातील इतर सदस्यांना पटल्यानंतर त्यांनी आपसात समजोता करून प्रकरण इथेच मिटविले व भविष्यात कौटुंबीक वाद होतील नाही याची श्‍वास्वती दिली.

हेही वाचा -  कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

...अन् सोडला सुटकेचा श्‍वास
पती-पत्नीच्या वादात मुला-बाळांचे होणारे हाल-अपेष्टा लक्षात घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला. दोन्ही कुटुंबातील महिला त्यांच्या पती, मुलांसोबत हसत-हसत घरी गेल्याने पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन सानप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बोदडे, महिला पोलिस नाईक सिंधू गवई, पोलिस हवालदार दयाराम राठोड यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT