Janmashtami  Esakal
संस्कृती

Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या या 3 कृष्ण लीला तुम्हाला माहिती का?

भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आणि त्यांच्या बालक्रिडा अप्रतिम आहेत. भगवान विष्णूचा अवतार मानले जाणारे श्री कृष्ण 16 कलांनी संपन्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे.आणि शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो.

भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आणि त्यांच्या बालक्रिडा अप्रतिम आहेत. भगवान विष्णूचा अवतार मानले जाणारे श्री कृष्ण 16 कलांनी संपन्न आहे. श्री कृष्णाच्या बालपणीची खोडकर शैली आणि त्यांचे अनोख्या लिला सर्वांनाच भुरळ घालत असे. चला तर मग या माखन चोर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातील तिन वेगवेगळ्या लिलाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

कारागृहातील लीला...

भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात माता देवकीच्या पोटी झाला. वासुदेव आणि देवकीच्या सात लेकरांना कंसाने आधीच मारले होते. कंसाचा वध करण्यासाठीच भगवान विष्णूने कृष्ण म्हणून जन्म घेतला. आणि कृष्णाचा जन्म होताच तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि तेव्हाच आपोआप सगळे पहारेकरी गाढ झोपी गेले. ही होती बाल गोपाळांची लीला. यानंतर त्याचे वडील कृष्णाला रात्रीतून नांदगाव येथे घेऊन गेले होते.

पुतना राक्षसीनीला ठार मारले...

बालकृष्ण जिवंत असल्याचे कंसाला कळल्यावर त्याने कृष्णाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसीनीला पाठवले. पूतना वेश धारण करून कान्हाला तिच्या वक्षस्थळावर विष लावून दूध देऊ लागली, पण बाल गोपाळांचा महिमा इतका विलक्षण आहे की तिने पूतनाचे खरे रूप ओळखले. आणि बालकृष्णाने पूतनाचा जीव घेतला. अशा प्रकारे कान्हाने पुतना राक्षसीनीला ठार मारले. त्यावेळी बाल कृष्णाच्या या लीला पाहून अनेकजण थक्क झाले होते.

आता बघू या कालिया नाग कथा

जेव्हा बालकृष्णाच्या बालक्रिडेत करमणुकीचा उल्लेख येतो तेव्हा कालिया नागाचे नाव नक्की घेतले जाते. कंसाने भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पुढे अचानक कालिया नागाने यमुना नदीत तळ ठोकला आणि कालिया नागाच्या विषामुळे यमुना नदीचे सगळे पाणी काळे झाले होते. या विषाच्या पाण्यामुळे अनेक पशू-पक्षी मरू लागले होते. कृष्ण एकदा नदीच्या काठावर आपल्या मित्रांसोबत चेंडू फळी खेळत असताना अचानक चेंडू बालकृष्णा कडून यमुनेत गेला. आणि सहजरित्या कृष्णाने चेंडू आणण्यासाठी नदीत उडी मारली.कृष्णाने उडी मारताच क्षणी कालिया नाग खवळला, पुढे बालकृष्णात आणि कालिया नाग यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले.

शेवटी कालिया नाग समजून चुकले की हा कुणी सामान्य बालक नाही आहे. त्यामुळे विषारी कालिया नाग बालकृष्णा समोर नतमस्तक झाला. आणि कालिया नतमस्तक होताचं बाल कृष्ण कालिया नागाच्या फण्यावर नाचू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Regulatory Technology: अमेरिकेतील रेग्युलेटरी टेक्नॉलॉजी चा झपाट्याने वाढणारा उद; भारत ह्या संधीपासून दूर तर राहत नाहीये ना?

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: शेकापच्या मेळाव्यात संजय राऊत-राज ठाकरे एकत्र

चक्क 1 रुपयांत रिचार्ज! 'या' कंपनीने दिली सुपर ऑफर; मिळणार अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा अन् बरंच काही, बघा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT