Bhagvatgita
Bhagvatgita Esakal
संस्कृती

गीता जयंती 2021 | श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमधून धर्म-कर्माचे ज्ञान दिले

सकाळ डिजिटल टीम

गीता जयंती | Geeta Jayanti 2021:

आज गीता जयंती (Geeta Jayanti) आहे. या दिवसाला हिंदू धर्मात (Hindu Relision) विशेष महत्त्व आहे, गीतेत सर्व जीवनाचे सार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गीता जयंती हा सण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला साजरा केला जातो. मोक्षदा एकादशीच्या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला धर्म आणि कर्म समजावून सांगितला. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या उपदेशाला गीता म्हणतात. जीवन जगण्याचे तसेच धर्म आणि कर्मांचे पालन करण्याचे महत्त्व गीतेच्या उपदेशात सांगितले आहे.

गीता जयंती 2021 च्या दिवशी गीता वाचणे, श्रवण करणे आणि दाखवलेल्या मार्गावर चालणे अत्यंत शुभ मानले जाते. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय (Adhyay- chapter) आणि 700 श्लोक (Shlokas) आहेत. गीता हा एकमेव ग्रंथ आहे ज्याची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. गीता 'श्रीमद् भगवत् गीता' (Shrimad Bhagvad Geeta) आणि 'गीतोपनिषद' म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार गीतेची शिकवण आत्मसात करून त्याचे पालन केल्याने सर्व अडचणी आणि शंका दूर होतात. गीतेचा अभ्यास करून जीवनात यश मिळवता येते. गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने व्यक्ती कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते. जीवन जगण्याची कला, व्यवस्थापन आणि कृती या सर्व गोष्टी गीतेच्या शिकवणुकीत आहेत. हिंदू धर्मात (Hindu Religion) गीतेला अनन्य साधारण महत्त्व आहे.

भगवान श्रीकृष्णानेगीता जयंतीच्या निमित्ताने आपण गीतेचे काही उपदेश जाणून घेऊया...

1. ज्यांची बुद्धी अनेक शाखांमध्ये विभागलेली असते, ते आपले ध्येय कधीच साध्य करू शकत नाहीत. (2.41)

2. देव सर्व आध्यात्मिक आणि भौतिक आहे आणि त्याच्यापासून सर्व काही उद्भवते. (१०.८)

3. या जगातील सर्व जीव हे ईश्वराचे अंश आहेत. (१५.७)

4. वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत. (16.21)

5. जिथे देव असतो तिथे नेहमीच ऐश्वर्य, विजय आणि अलौकिक शक्ती असते. (18.78)

6. देव प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आणि त्याच्याकडून स्मृती आणि विस्मरण येते. (१५.१५)

7. भक्ती हे भगवंताला जाणण्याचे एकमेव साधन आहे. (18.55)

8. शेवटी त्याच भावनेची आठवण ठेवणाऱ्याला ती अनुभूती येते. (८.६)

9. निसर्ग सतत बदलत असतो. (८.४)

10. दुष्ट आणि मूर्ख लोक देवाचा आश्रय घेत नाहीत. (७.१५)

11. ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. (४.३४)

12. भगवंतावर कोणत्याही कर्माचा परिणाम होत नाही किंवा तो कोणत्याही कर्माच्या बंधनाने बांधलेला नाही. (४.१४)

13. आत्मा जन्म घेत नाही आणि मरत नाही. (2.20)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT