Chanakya Niti for Bad Phase esakal
संस्कृती

Chanakya Niti : माझ्याच सोबत असं का होतं? आचार्य चाणक्य यांच्या ५ टिप्स अशाच काही वाईट प्रसंगांसाठी

आपल्या आजूबाजूला किमान ५ लोकं असतात जे आपल्याला खूप जवळचे वाटतात कठीण प्रसंगी अशा लोकांसोबत रहा....

सकाळ डिजिटल टीम

Chanakya Niti for Bad Phase : आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. त्यांनी आपल्या हुशारीने आणि रणनीतीने चंद्रगुप्त मौर्याला राजा बनण्यास मदत केली त्याला रणनीती, राजकारण आणि अर्थशास्त्र या साऱ्यात पारंगत केले आणि स्वतः राज्य चालवण्यात त्यांना मदत केली.

आचार्य चाणक्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली. चाणक्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही.

प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत अनेकांनी आपल्या जीवनात यश प्राप्त केलं आहे.

असा कोणीच नाही ज्याला चाणक्य नितीचा लाभ नाही झाला. 'चाणक्य धोरण' आणि 'नितीशास्त्र' हे आचार्य चाणक्य यांच्या अनुभवांचा संग्रह आहे. ज्यामध्ये जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

चाणक्य नीतीनुसार, आचार्य चाणक्य सांगतात की, वाईट काळ हा सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, असं म्हणतात सुख आलं की दुःख हे येतच, अशात आपण अनेकदा खचून जातो. अशा वेळी वाईट काळात खचून न जाता त्याला तोंड देण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची कलाही अवगत केली पाहिजे.

कारण कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाणारा माणूस कधीच हरत नाही. म्हणूनच वाईट काळात आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत मिळेल.

चाणक्य म्हणतात की, माणसाला कठीण परिस्थितीत आपली ताकद, संयम आणि ताकद दाखवावी लागते. त्यांच्या मते, वाईट वेळेवर मात करण्यासाठी संयम बाळगला पाहिजे.

चाणक्यांनी नीतीशास्त्रात अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याने माणसाला वाईट प्रसंगी सामोरे जायला बळ मिळते. चाणक्य सांगतात की, माणसाने वाईट काळात या पाच गोष्टी कधीही विसरु नये. चला जाणून घेऊया संकटाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

या ५ गोष्टी कधीही विसरु नका

१. संयम ठेवा

माणसाच्या आयुष्यात वाईट वेळ कधीच सांगून येत नाही पण चाणक्य नीतीनुसार, अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवर संयम ठेवला पाहिजे. कधीच धीर सोडू नका, मान्य करा की एक ना एक दिवस तुमचा हा काळ संपणार आहे आणि त्यासाठी मेहनत घ्या.

आपल्या तत्वांवर ठाम रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही काहीही झालं तरी आपले गांभीर्य सोडू नका. कारण कठीण प्रसंगी गंभीर होऊन निर्णय घेणे सोपे जाते.

२. जवळच्या लोकांसोबत रहा

जो आपल्या वाईट काळात आपल्या बाजूने उभा राहतो तोच आपला जवळचा व्यक्ती. आपल्या आजूबाजूला किमान ५ लोकं असतात जे आपल्याला खूप जवळचे वाटतात कठीण प्रसंगी अशा लोकांसोबत रहा, आपल्या कुटुंबाचा आणि शुभचिंतकांचा सहवास सोडू नये.

कितीही कठीण वेळ आली तरी कुटुंब सोबत असेल तर प्रत्येक अडचणीवर हसतमुखाने मात करता येते. आपल्या जवळच्या व्यक्तीला जोडीदाराला सगळं सांगा, संकटाच्या वेळी कुटुंबासोबत राहिल्याने व्यक्तीला मानसिक दृष्ट्या खूप बळ मिळते.

३. नेहमी सकारात्मक विचार करा

आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. आपलं मन सकारात्मक असेल तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, लक्षात ठेवा मन चिंती ते वैरी ना चिंती... आणि आपण जे बघतो, ज्याचा विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडतं, अशात वाईट विचार का करायचा?

आशावादी असणं कठीण आहे, पण उगाच निगेटिव्ह वॉचर करुन आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देण्यापेक्षा सकारात्मक विचार करा. आचार्य चाणक्य सांगतात की जो व्यक्ती वाईट काळात सकारात्मक विचार मनात ठेवतो त्याला नुकसान सहन करावे लागत नाही. उलट सकारात्मक विचारांमुळे तो वाईट काळातूनही मार्ग काढतो.

४. प्लॅनिंग करा.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्लॅनिंग. आपला वाईट काळ हा आर्थिक, मानसिक किंवा कौटुंबिक कोणत्याही दृष्ट्या येऊ शकतो. अशात यातून आपल्याला कोणीही दूसरा तिराहित व्यक्ती येऊन मदत करणार नाहीये. आपल्यालालच आपली मदत करावी लागणार आहे अशात न खचता धीराने उभे रहा, या काळातून बाहेर पडण्यासाठी प्लॅनिंग करा.

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा वाईट किंवा वाईट वेळ येते तेव्हा संयमाने काम करा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी रणनीती तयार करा. जेणेकरून कठीण काळात तुम्हाला जास्त नुकसान सहन करावे लागणार नाही. रणनीती बनवल्यास माणसाला कमी नुकसान सहन करावे लागते आणि वाईट काळ पार करणे सोपे जाते.

५. शत्रूला आपले विक पॉईंट्स सांगू नका

चुकूनही, आपल्या शत्रू समोर हत्यार टाकू नका. त्याला दाखवू नका की तो तुमच्यावर हावी होतो आहे असं केलं तर समजा की तुम्ही हरला आहात पण याच उलट जर तुम्ही त्याला दाखवून दिलं की तुम्ही घाबरला नाही आहात तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकलात असं समजा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT