Iran_India 
देश

Coronavirus : सुटलो बाबा एकदाचे; कोरोनाग्रस्त इराणमधील भारतीय मायदेशी परतले!

वृत्तसंस्था

जैसलमेर : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे आजच्या आकडेवारीवरून दिसून येते. अशातच आता परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. 

इराण, इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. एअर इंडियाच्या दोन विमानांनी रविवारी (ता.१५) सकाळी जवळपास २३६ नागरिकांना इराणमधून भारतात आणण्यात आले आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथील भारतीय सैन्याच्या एका कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, एकूण २३४ भारतीयांना इराणमधून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या दोन विमानांनी आज सकाळी जैसलमेर येथील विमानतळावर लँडिंग केले. यामध्ये एकूण १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरूंचा समावेश आहे. याकामी मदत करणारे राजदूत धामू गद्दाम आणि त्यांच्या टीमचे जयशंकर यांनी आभार मानले. 

कर्नल घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''जैसलमेर येथे उभारण्यात आलेले केंद्र हे पूर्णपणे सुसज्ज असे आहे. तसेच याठिकाणी कुशल वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.'' इराणमधून आणलेल्या भारतीयांना १४ दिवस या केंद्रात ठेवले जाणार असून त्यानंतरच आवश्यक वाटल्यास त्यांना सोडण्यात येणार आहे. या सर्व भारतीय नागरिकांची काळजी घेणं यासाठी भारतीय सैन्य तत्पर आहे, असेही कर्नल घोष यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरस (कोविड-१९)ला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT