Dr. Aambedkar google
देश

Dr. Aambedkar : पालकांचं १४वं अपत्य, ५व्या वर्षी आईला गमावलं; कसं होतं बाबासाहेबांचं बालपण ?

वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर त्यांची मावशी मीरा यांनी चार बहिणी आणि भावांचा सांभाळ केला.

नमिता धुरी

मुंबई : संविधानाचे शिल्पकार म्हणवले जाणारे बाबासाहेब म्हणजेच डॉ. भीमराव आंबेडकर यांची आज जयंती. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू कॅन्टोन्मेंट येथे एका महार कुटुंबात झाला.

त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तहसील अंतर्गत आंब्रावेडे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीराव आणि आजोबांचे नाव मालोजी सकपाळ होते.

बाबासाहेबांचे बालपणीचे नाव भीमराव एकपाल ऊर्फ भीमा असे होते. त्यांचे वडील रामजी राव हे सैन्यात काम करायचे. वडील रामजी कबीर पंथाचे मोठे अनुयायी होते, तर आई भीमाबाई याही धार्मिक स्वभावाच्या गृहिणी होत्या. (childhood of Dr. babasaheb aambedkar life history of Dr. B. R. Ambedkar) हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी ?

भीमराव हे त्यांच्या पालकांच्या १४ मुलांपैकी ११ मुली आणि ३ मुले यापैकी शेवटचे अपत्य होते. भीमरावांच्या माजी १३ मुलांपैकी बलराम, आनंदराव, मंजुळा आणि तुळसा ही फक्त ४ मुले जिवंत होती, तर भीमरावांची उर्वरित भावंडं अकाली मरण पावली होती.

२० नोव्हेंबर १८९६ रोजी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर त्यांची मावशी मीरा यांनी चार बहिणी आणि भावांचा सांभाळ केला. भीमराव लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. ते अभ्यासात खूप हुशार होते.

१९०८ मध्ये भीमराव अवघ्या १७ वर्षांचे असताना त्यांचे लग्न रमाबाई यांच्याशी झाले. तेव्हा रमाबाईंचे वय अवघे १४ वर्षे होते. लग्नानंतरही डॉ. भीमराव उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि नंतर देशात परतल्यावर त्यांनी इथे काय इतिहास घडवला आपल्याला माहितीच आहे.

बाबासाहेब जेव्हा त्यांचा मोठा भाऊ आनंदसोबत दापोलीतील शाळेत जायचे तेव्हा त्यांचे वर्गमित्र त्यांची चेष्टा करत. वर्गमित्र म्हणायचे, 'जे गुरेढोरे पाळतात आणि काठ्या धरतात ते पेन काय धरणार ?'

दोन्ही भावांना वर्गाच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसवले जात असे. एके दिवशी बाबासाहेबांनी वडिलांना या गोष्टी सांगितल्या.

हे सर्व ऐकून वडिलांनी दोघांनाही साताऱ्याच्या शाळेत दाखल करून घेतले. मात्र, तिथेही प्रवेश इतका सोपा नव्हता. दोन्ही भाऊ तिथे पोहोचले तेव्हा जुन्या शाळेसारखीच अवस्था होती.

बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. पण त्यांनी शिक्षकांना कोणताही प्रश्न विचारला की शिक्षक त्यांना म्हणायचे, 'तू अस्पृश्य आहेस, हे सगळं कळल्यावर तू काय करणार ?'

त्यानंतर वडीला बाबासाहेबांना मुंबईला घेऊन आले. मुंबईतील खोली खूपच लहान होती. एवढी लहान की पिता-पुत्रांना आळीपाळीने झोपावे लागे. मुंबईत त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण इथेही तीच अवस्था होती.

'तुम्ही अस्पृश्य आहात. आम्हाला हात लावू नका. अभ्यास करून काय करणार, तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी आमच्यापेक्षा मोठे होणार नाही, असे टोमणे त्यांना ऐकावे लागत. बाबासाहेबांना पूर्ण विश्वास होता की या शिक्षणामुळे त्यांचे भावी जीवन बदलून जाईल.

१९०७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. निकाल लागला तेव्हा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होता. आता टोमणे मारणारे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. ध्येय स्पष्ट असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले होते. त्यांच्या या कठोर परिश्रमांचे फलित म्हणून भारताला संविधान मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT