देश

अजितदादांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत

मालेगावमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार; अजित पवारांच्या उपस्थित पार पडला प्रवेश सोहळा

सुधीर काकडे

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्या उपस्थित मालेगावमधील काँग्रेसचे (Congress) माजी आमदार आणि नगरसेवक अशा एकूण 27 जणांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आह. यामध्ये माजी आमदार रशीद शेख शफी, काँग्रेसचे 27 आणि एमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. राज्यात काँग्रेसचा सफाया झाला होता, तरी मालेगावमध्ये आम्ही काँग्रेस टिकवली होती. पण आता काँग्रेला आमची गरज नाही, आम्हाला कोणी बघत नाही, कोणी विचारत नाही. विलासराव देशमुख आमच्याकडे लक्ष देत होते. मात्र आता कोणीच बघत नाही. नाना पटोलेंनी दोन वेळा वेळ दिली आणि ते आले नाहीत. या गोष्टींमुळे आम्ही पक्ष सोडत असल्याचं रशीद शेख शफी यांनी सांगितलं आहे.

अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, हा प्रवेश कार्यक्रम मालेगावला मोठा करायचा होता मात्र, कोरोना आला. नियम आहेत ते आपणच कसे तोडायचे, त्यामुळं इथे कार्यक्रम करायचं ठरलं. येणाऱ्या काळात मालेगावला चांगला निधी देण्याचा प्रयत्न करू असंही ते यावेळी म्हणाले. तसंच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करतात त्याबद्दल तुमचे आभार, पण तुमच्या कृतीतुन राष्ट्रवादीला कमीपणा होऊ देऊ नका. तुमच्या वरती आगीतून फुपाट्यात आल्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. महापालिकेला निधी द्यायचा आमचा प्रयत्न असतो.

दरम्यान, महापौर ताहेरा शेख रशीद यांनीही पक्ष आम्हाला विचारत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याचं सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT