Liquor 
देश

दारु पिण्यासाठी २१ वर्षांची अट, दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने दारू पिण्याचे वय २५ वरून २१ केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी (ता.२२) याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियात बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. नव्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या राजधानीमध्ये यापुढे कोणतीही नवीन दारुची दुकाने उघडली जाणार नाहीत, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.

तसेच राजधानी दिल्लीत ६० टक्के दारुची दुकाने दिल्ली सरकार चालवत आहे. तर ४० टक्के दारुची दुकाने इतर खासगी व्यावसायिकांद्वारे चालवली जात आहेत. नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसूलात आणखी वाढ होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असं उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले. 

विशेष म्हणजे, दिल्लीच्या जवळच असलेल्या नोएडा आणि गुरुग्राम शहरांमध्ये दारू पिण्याचं कायदेशीर वय हे २५ आहे. २०१६ पासून दिल्लीमध्ये दारुसाठीची नवीन दुकाने उघडली गेली नाहीत, तसेच यापुढेही नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत. २१ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियात मीम्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT