father of four child marry with mother of three child in raipur 
देश

माझा नवरा चार मुलांचा बाप अन् त्याला पळवतेस...

वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड): तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे चार मुलांचा बाप असलेल्या नागरिकाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी घर सोडून पळ काढला आणि एकत्र राहू लागले. पण, प्रेयसीच्या नवऱयाने दोघांवर हल्ला करत जखमी केले. या घटनेत प्रेयसी-प्रियकर गंभीर जखमी झाले आहेत.

ईश्वरी नावाच्या महिलेचे आठ वर्षांपूर्वी नरेंद्र सोबत विवाह झाला होता. दोघांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. ईश्वरीची दयासागर सोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दयासागरला चार मुले आहेत. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पळून जाऊन विवाह केला व रायपूरमध्ये राहू लागले.

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय...

दयासागरच्या पत्नीनेही आम्हाला चार मुले आहेत, माझ्या पतीला आमच्याकडे येऊ दे म्हणून ईश्वरीसोबत भांडण केले. पण, दयासागर ईश्वरीला सोडायला तयार नव्हता. ईश्वरीच्या पतीने आपल्या पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, ईश्वरी घरी यायला तयार नव्हती. अखेर ईश्वरीच्या पतीने पत्नीचा खून करण्याचे ठरवले. धारदार वस्तू घेऊन तो ईश्वरीकडे गेल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. ईश्वरीवर त्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. ईश्वरीला वाचविण्यासाठी दयासागर मध्ये पडल्यानंतर त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोघांवर हल्ला केल्याप्रकरणी ईश्वरीच्या पहिल्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयासागरने ईश्वरीच्या तीन मुलांना सांभाळण्याची तयारी आहे, पण पहिला पती मुलांना देत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT