grooms father and brides mother elope at gujrat 
देश

तरुणपणांचं प्रेम मुलांच्या विवाहापूर्वीच पळालं...

वृत्तसंस्था

सूरत (गुजरात): दोघांचे तरुणपणी एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघांचा विवाह होऊ शकला नाही. दोघांनी एकमेकांच्या मुला-मुलीचा विवाह ठरवला. पण, विवाहापूर्वीच विहीण आणि व्याह्याने धूम ठोकल्याची घटना येथे घडली. दोघे पळून गेल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.

नवरदेवाच्या वडिलांनी नवरीच्या आईला पळवले आहे. विहीण-व्याही पळून गेल्यामुळे त्यांच्या मुलांचा विवाह मोडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुरतमधील काटरगाम येथे राहणाऱया मुलाचा नवसारी येथील युवतीसोबत फेब्रुवारीमध्ये विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबियांमध्ये विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. परंतु, विवाहापूर्वीच मुलाचे वडिल आणि युवतीची आई पळून गेली आहे. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विवाह मोडला आहे. दोन्ही कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, नवरदेवाचे वडील आणि नवरीची आई पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. दोघांचे तरुणपणी एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघांचा विवाह होऊ शकला नव्हता. दोघांनी एकमेकांच्या मुलांचा विवाह निश्चित केला. परंतु, अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांच्या जवळ आल्यामुळे दोघांमधील प्रेम पुन्हा वाढले. विवाहास एक महिना असतानाच दोघे पळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs AUS: पाकिस्तानी चिटर! Out नसताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अंपायरने दिले बाद, Video Viral

Cigarette: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा धक्का! सिगारेटच्या किमती ५५ रुपयांनी वाढल्या; तुमच्या आवडत्या ब्रँडचा नवीन दर किती? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर, 6 जणांचा होणार सन्मान

Rohit Shetty murder plot : लॉरेन्स टोळीने रचला होता रोहित शेट्टीच्या हत्येचा कट? ; ‘FIR’मधून खळबळजनक माहिती उघड!

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT