rain update sakal
देश

दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

विमानतळासह दिल्ली पाण्यात, विमानतळावरून होणारी तीन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असताना, शनिवारी या पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका बसलाय. दिल्लीच्या विमानतळावरून होणारी तीन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच पाच विमाने विमानतळावर उतरणार होती. परंतु त्यांना अन्यत्र वळविण्यात आले आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळावर साचलेले अर्धातासात दूर केल्याचे स्पष्ट केले आहे.

गेले काही दिवस दिल्लीत उकाडा वाढल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाळा सुरवात झाली. दिल्ली शहर . दिल्ली एनसीआर आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याची तळी साचली. त्याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीनवरील काही दर्शनी भाग पाण्याखाली गेला होता. दिल्लीत विमानतळावर येणारी विमानेही जयपूर आणि अहमदाबादकडे वळविण्यात आली आहेत. विमानतळासए एअरोसिटी परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते.

मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याची दखल विमानतळ प्राधिकरणाकडून लगेचच घेण्यात आली. दिल्लीत विमानतळावर येणारी चार आणि एक आंतरराष्ट्रीय विमान जयपूर तसेच अहमदाबादकडे वळविण्यात आले. पाणी हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. सकाळी नऊ वाजता विमानतळांवरील कामकाज पूर्ववत झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही फोटो आणि एक व्हिडिओ ट्विट केला असून, अर्धातासात पाणी हटविण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली विमानतळासह दिल्लीतील अनेक भागांत प्रचंड पाणी साचले, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. दुचाकी, रिक्षा आदी वाहने या पाण्यात बंद पडल्याने त्यांना लोटून नेण्याची वेळ नागरिकांवर आली. दिल्लीच्या इंडिया गेट, मिंटो रोड, आयटीओ, आर. के. पूरम, मोती बाग, पालम, द्वारका आणि मधूविहार या भागात अनेक ठिकाणी पाणी साचून होते.

त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. धौला कुआं ते गुरुग्राम, आझादपूर ते मुबारका चौक यांसह द्वारका ते पालम आदी बहुतांश मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक यंत्रणेला रस्त्यावर उतरून वाहतुकीला अन्य मार्गाने वळावावे लागत होते.

दिल्लीत गेल्या दिवसांपासून उकाडा होता. हवेतील आर्द्रता वाढल्याने दिल्लीकर घामाघूम होत होते. त्यात संततधार पावसाने किमान तापमान २५ अंश सेल्सियस नोंदले गेले. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT