देश

हैदराबाद 'निर्भया' प्रकरण; नागरिक रस्त्यावर, 3 पोलिस निलंबित

वृत्तसंस्था

हैदराबाद/नवी दिल्ली : शहरातील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. या राक्षसी कृत्याबद्दल हैदराबाद आणि तेलंगणमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत शादनगर पोलिस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली.  दरम्यान, एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

शमशाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी शादनगर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करीत "आम्हाला न्याय हवा' अशी घोषणाबाजी केली. या गुन्ह्यातील आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणीही जमावाने केली. पोलिसांनी ठाण्याभोवतालची सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तमिलीसई सौंदरराजन, चेव्हेल्लाचे खासदार रणजित रेड्डी यांनी आज पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

रंगारेड्डी जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या कार्यकारी समितीने या घटनेचा निषेध केला आहे. यातील आरोपींचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, असे आवाहन सदस्यांना केले आहे. यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी विशेष न्यायालयाला केली आहे. 

हैदराबादमधील या घटनेचा निषेध करीत अनू दुबे या युवतीने महिलांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आज नवी दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी तिला जबरदस्तीने तिथून संसद ठाण्यात नेले. सुमारे चार तास तेथे ठेवून नंतर तिला सोडण्यात आले. हे आंदोलन केवळ हैदराबाद प्रकरणाविरोधात नसून सर्व प्रकारच्या अत्याचाराविरोधात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी होते, असे तिने सांगितले. 

पोलिसांवर कारवाईची मागणी 

राष्ट्रीय महिला आयोगाने या हत्याकांडाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. पीडितेच्या वडिलांना मदत देण्यास नकार देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडियातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक संताप व्यक्त करीत आहेत. यात केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल, गजेंद्रसिंह शेखावत, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल आदी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

गृहमंत्र्यांची सारवासारव 

या नृशंस घटनेने वातावरण तापलेले असतानाच तेलंगणचे गृह राज्यमंत्री मोहंमद मोहंमद अली यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाने संतापाची लाट उठली. "पीडितेने तिच्या बहिणीला फोन करण्याऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता,' असे विधान त्यांनी केले होते. नंतर त्यांनी याची सारवासारव केली. "पोलिसांना वेळेत माहिती मिळाली असती तर संबंधित मुलीचा जीव वाचला असता, असे मला म्हणायचे होते,' असा खुलासा अली यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र व मंत्री के. टी. रामाराव या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT