Mahatma Gandhi Birth Anniversary esakal
देश

Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे ९ विचार जे तुम्हालाही देतील जगण्याचा नवा मार्ग

महात्मा गांधींचे हे तीन विचार जपलेत तर आयुष्यात मिळेल यश

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Gandhi Jayanti : सत्य आणि अहिंसा हा एकच मंत्र जपणारे देशपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधीचे विचार आजही अनेकांच्या जीवनात आदर्श ठरतात. या महान व्यक्तीच्या काही महत्वाच्या विचारांचा प्रभाव तुमच्याही आयुष्यात असेल तर तुम्हालाही यश मिळेल आणि तुमचं आयुष्य सुधारेल.

आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक चांगला व्यक्ती असणं आणि त्याबरोबर आपल्या ज्ञानात चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करणे महत्वाचे ठरते. त्यासाठी महात्मा गांधींचे हे नऊ विचार तुम्ही आत्मसात करायला हवेत.

१) चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण

२) ईश्वर म्हणजे सत्य, प्रेम, नीती

३) शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठी करावा

४) हा महार, तो ब्राम्हण असा उच्च नीच भाव निर्माण होत असेल तर त्या धर्माला मी धर्म मानणार नाही.

५) जोपर्यंत संबंध मानवजातीत ऎक्याच्या भावनेस महत्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जपतप निरर्थक आहेत.

६) सुधारणा म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावित राहतो ते आचरण.

७) माणसात जे सत्य, सद्गुण असतात, त्यांना प्रकाशात आणणे हे शिक्षणाचे कार्य आहे.

८) जिज्ञासा असल्याशिवाय ज्ञान मिळणे शक्य नाही. जिज्ञासा ही ज्ञानाची पहिली पायरी होय.

९) धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याच्या वाटा. माणसातील माणुसकी, मानवता, प्रगट करणारा तो खरा धर्म.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT