Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.

 

esakal

देश

Modi Cabinet Approves New Railway Projects : मोदी सरकारचा मोठा निर्णय! चार नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्राचाही समावेश

Modi Government approves four new railway projects : केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांची माध्यमांना माहिती दिली आहे.

Mayur Ratnaparkhe

Indian Railways New Projects :  मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटने चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मीडियाला याबाबत माहिती देताना केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, की सात रेल्वे कॉरिडॉर एकूण रेल्वे वाहतूकीच्या ४१ टक्के वाहतूक करतात. आम्ही अशातच या कॉरिडॉरना मजबूत करण्यासाठी आणि अधिक जोडण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत." तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, आता हे कॉरिडॉर चार पदरी आणि शक्य असेल तेथे सहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय कॅबिनेटने चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च जवळपास २४ हजार ६३४ कोटी रुपये आहे. जाणून घेऊयात, या नव्या चार रेल्वे प्रकल्पांमध्ये कोणत्या मार्गाचा समावेश आहे?

१.महाराष्ट्रात वर्धा – भुसावळ दरम्यान तीन पदरी आणि चार पदरी रेल्वे मार्गाला मजुंरी मिळाली आहे, याचे एकूण अंतर ३१४ किलोमीटर आहे.

२.गोंदिया-डोंगरगढ दरम्यान चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. ज्याचे एकूण अंतर ८४ किलोमीटर आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये येतो.

३. वडोदरा-तलाम दरम्यान तीन आणि चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. ज्याचे एकूण अंतर २५९ किलोमीटर आहे. हा मार्ग गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये येतो.

४. मध्यप्रदेशात इटारसी-भोपाळ-बीनाल दरम्यान चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे, ज्याचे एकूण अंतर २३७ किलोमीटर आहे.

यासंदर्भात केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, जसजसे अनेक रेल्वे प्रकल्प येत आहेत, लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होत आहे. लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेसह आपल्या सारख्या अनेक देशांनी रेल्वेवर भर दिला आहे, कारण ही पर्यावरणपूरक आहे आणि खर्च कमी करण्यासही मदत करते.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील १८ जिल्ह्यांचा समावेश असणारे हे चार रेल्वे प्रकल्प, भारतीय रेल्वेच्या सद्यस्थितीतील नेटवर्कला जवळपास ८९४ किलोमीटरपर्यंत वाढवतील. केंद्राकडून मंजूर केलेल्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे जवळपास ३ हजार ६३३ गावं, ज्यांची लोकसंख्या ८५.८४ लाख आहे आणि दोन जिल्हे (विदिशा आणि राजनांदगांव) पर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL

गौतम गंभीरच्या राज्यात 'पराभव' हा पर्यायच असू शकत नाही, Varun Chakravarthy चे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या शैलीवर मोठं भाष्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?

Bhoom News : रास्ता रोको केल्याने शेतकरी पुत्रावर गुन्हा दाखल; खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त

SCROLL FOR NEXT