देश

शेतकऱ्यांशी संवादावेळी पंतप्रधान मोदींची ममतांवर टीका;लातूरच्या शेतकऱ्यांचाही उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता आज, 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्या संदर्भात शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधानांना काही शंका विचारल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांन पश्चिम बंगाल सरकारवर टीका करत तेथील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेरणी करण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकरी बांधवांना आज, योजनेचा लाभ मिळाल नाही, याचं मला दुःख वाटतंय. बंगालमधील 23 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. परंतु, राज्य सरकारने शेतकऱ्यांची शहःनिशा करण्याची प्रक्रियाच थांबवली होती. 

ममता बॅनर्जी, यांचे विचार बंगालचा नाश करत आहेत. त्यांच्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे मला खूप वेदना झाल्या आहेत. यावर विरोधक गप्प का आहेत?

पश्चिम बंगालमध्ये कोणतेही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत. त्या पक्षांनी दिल्ला यावं आणि शेतकऱ्यांसंदर्भा चर्चा करावी. जे राजकीय पक्ष आणि नेते एपीएमसी संदर्भात बोलत आहेत. त्यांनी केरळकडे पहावं, केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमित्या नाहीत. शेतकऱ्यांनी कधीही तेथे आंदोलन केलेले नाही. 

केरळमधील शेतकरी केवळ सेल्फी काढण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

आसाम, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पंचायत निवडणुका झाल्या. त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी मतदान केले आहे म्हणजे, त्यांना विरोधक करत असलेली दीशाभूल लक्षात आली आहे. 

आपण नव्या कायद्यात आणखी शेती उत्पादनांना किमान आधारभूत किंमत (हमीभाव-एमएसपी) मिळवून देत आहोत. यापूर्वी काही ठराविक पिकांनाच किमान आधारभूत किंमत मिळत होती. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार आपण, पिकांना दीडपट किमान आधारभूत किंमत (हमीभाव) देत आहोत. 

महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु, पंतप्रधान पिक विमा योजनेचा त्यांना लाभ मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT