Indian Railways
Indian Railways  esakal
देश

भरती आधीच रेल्वे कडून 1,320 पदे रद्द

सकाळ डिजिटल टीम

भारतात दिवसेंनदिवस बेरोजगारी वाढत आहे, आणि एकीकडे भारतीय रेल्वे कडून जवळपास 1,320 पद रद्द केली आहेत. विषेश म्हणजे या विभागामध्ये आधिच कर्मचाऱ्यांची कमी असताना, देखील हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेमध्ये ग्रुप डी आणि एनटीपीसीच्या सुमारे 1.5 लाख पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान ही बातमी खूपच निराशाजनक आहे. या पदांमध्ये यांत्रिकी विभागातील 596 पदे, वैद्यकीय विभागाची 280 पदे आणि अभियांत्रिकीची 213 पदे आहेत.

ही पदे रद्द केल्यानंतर तरुणांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना ही पदे रद्द करणे अत्यंत निराशाजनक आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा ताणव वाढत आहे. अशी पदे रद्द केली तर बेरोजगारी वाढेल. विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे दरवर्षी शेकडो कर्मचारी निवृत्त होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी असिस्टंट लोको पायलटची पदेही रद्द केली होती. कार्मिक विभागाने 436 पदे रद्द करण्यासाठी नोटीस बजावली होती. 2022 मध्ये ईशान्य रेल्वेच्या तिन्ही विभागांमध्ये सुमारे 55 हजार कर्मचारी आणि अधिकारी आहेत. यातील बहुतांश कर्मचारी लखनौ विभागातील स्थानकांवर आणि गोरखपूर मुख्यालयात कार्यरत आहेत. एकट्या गोरखपूर वर्कशॉपमध्ये 5000 हून अधिक कामगार काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT