Political strategist Prashant Kishor addresses the media explaining why he chose not to contest the Bihar Assembly Elections.

 

sakal

देश

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

Prashant Kishor’s Big Reveal on Bihar Assembly Elections : मला निवडणूक लढवायची होती, पण... असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor reveals reason behind not contesting Bihar Assembly Elections: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. अनेक पक्ष विविध जागांवर दावे करत आहेत. यंदा बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीनेही उडी घेतली आहे. तर प्रशांत किशोर हे निवडणूक लढवणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय़ का घेतला, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर यावर खुद्द प्रशांत किशोर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले, "निवडणुका न लढण्याचे कारण वेळेची कमतरता आहे. दशकांमध्ये पहिल्यांदाच, एक पक्ष शून्यापासून सुरुवात करत आहे आणि २४३ जागांवर निवडणूक लढवत आहे. यामध्ये शेकडो लोक लागले आहेत. मी निवडणूक लढवावी की नाही याबद्दल पक्षात व्यापक चर्चा झाली.’’

तसेच, ‘’एकूणच, प्रचारासाठी आमच्याकडे १८ दिवस शिल्लक आहेत. जर मी निवडणूक लढवली असती तर आम्हाला किमान ३ ते ४ दिवस तिथे घालवावे लागले असते. त्या चार दिवसांत, मी इतर ३० ते ४० विधानसभा मतदारसंघांना भेट देऊ शकलो नसतो. म्हणून, पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांनी ठरवले की शक्य तितक्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचणे ही पहिली प्राथमिकता आहे आणि म्हणून, मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.’’ असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, प्रशांत किशोर म्हणाले, "आम्ही २४३ जागांवर निवडणूक लढवत आहोत. इतर कोणत्याही पक्षाकडे सर्व जागा लढवण्याची ताकद नाही. बिहारमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा त्रिकोणी बनली आहे असे विरोधी पक्षांचेही मत आहे. आम्ही प्रत्येक पैसा गोळा करून पक्षाची उभारणी केली. मी एक जागा जिंकून आमदार होण्यापेक्षा प्रत्येक जनसुराज उमेदवाराने जिंकणे चांगले."

याचबरोबर ‘’जर जनसुराज उमेदवारांना असे वाटत असेल की प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल, तर मी स्वतःसाठी चार दिवस प्रचार करण्याऐवजी, ३०-४० उमेदवारांसाठी प्रचार करणे चांगले. मला निवडणूक लढवायची होती, परंतु पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले की ही माझी जबाबदारी आहे. अखेर लढण्याच्या फायद्यांवर आणि तोट्यांवर चर्चा केल्यानंतर, निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT