prashant kishor google
देश

सध्यातरी वेगळा पक्ष काढणार नाही पण बिहारसाठी काम करत राहणार : प्रशांत किशोर यांचं स्पष्टीकरण

२ ऑक्टोबरपासून पश्चिम चंपारण्यापासून ३ हजार किमीची पदयात्रा केली जाणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे की ते स्वत:चा पक्ष स्थापन करणार नाहीत. भविष्यात जर कोणताही पक्ष बनलाच तर तो सर्वांचाच असेल. तसेच आपण बिहारच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशांत किशोर यांनी बिहारची राजधानी पटना येथे पत्रकार परिषद घेतली. पुढील ३ ते ४ महिन्यांत १८ हजार नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी चर्चा करून अनेक गोष्टी समजून घेतल्या जातील. ते सहमत असतील तर त्यांना सोबत घेतली जाईल. त्यांनी सांगितले तर पक्ष स्थापन केला जाईल; पण तो फक्त माझा नाही तर सर्वांचाच पक्ष असेल.

बिहारच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेतल्या जाणार आहेत. तसेच भविष्यातील त्यांच्या अपेक्षांबाबतही चर्चा केली जाणार आहे. यासाठी २ ऑक्टोबरपासून पश्चिम चंपारण्यापासून ३ हजार किमीची पदयात्रा केली जाणार आहे. "जे माझ्याकडे आहे तर सर्व बिहारच्या विकासासाठी समर्पित केले जाणार आहे. कोणालाही मध्येच सोडण्याची इच्छा नाही", असे सांगत प्रशांत किशोर यांनी बिहारच्या नागरिकांना आश्वस्त केले.

आधीच्या सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, "लालू आणि नीतिश यांच्या ३० वर्षांच्या सत्तेनंतरही बिहार हे देशातील सर्वांत मागास राज्य आहे. विकासाच्या अनेक मानकांनुसार बिहार देशात अतिशय खालच्या पायरीवर आहे. येत्या काळात बिहारला वरचे स्थान प्राप्त करायचे असेल तर नवी विचारसरणी आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT