देश

JNU Violence : 'जेएनयू'तील हिंसाचारानंतर राजकारण पेटले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आज रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

'जेएनयू'तील या हिंसाचारावरून राजकारण पेटले असून, आम आदमी पक्षाने या हिंसाचारासाठी सत्ताधारी भाजपला जबाबदार ठरविले असून, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसने विद्यार्थ्यांवरील हल्ल्यास सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. 

जेएनयूमध्ये हल्ला झाल्याची माहिती मला मिळाली. गुंडांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे समजले. तसेच यातील एका विद्यार्थ्याने सांगितले, की पोलिसांनी माझ्या डोक्यावर अनेकदा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले. 

जेएनयूची घटना समजल्यानंतर धक्का : अरविंद केजरीवाल

जेएनयूमधील हिंसाचाराची घटना समजल्यानंतर मला धक्काच बसला, विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ले करण्यात आले. पोलिसांनी तातडीने हिंसाचार थांबवून शांतता कायम ठेवावी. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थीच सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल?, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  

देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती : राहुल गांधी

काही मुखवटाधारी गुंडांनी जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले केले यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती असल्याने ते शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आज विद्यापीठात झालेल्या हिंसाचारातून त्यांच्या भीतीचे प्रतिबिंब उमटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT