Sanjay-Raut-Shivsena 
देश

महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकार स्थापनेचा विषय पुढे सरकला नाही. पण, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिलीय. 

राऊत यांनी सोमवारी (ता.18) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला.

त्यावेळी राऊत म्हणाले, 'शरद पवार यांच्याशी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर चर्चा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत तुम्ही पंतप्रधानांची भेट घेऊ शकाल का?, अशी विनंती मी त्यांना केली. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्ठमंडळ पंतप्रधानांना भेटण्यासंदर्भातही चर्चा झाली. शरद पवार हे आमचे नेते आहे. त्यांची भेट घेणं हे माझं नित्याचं काम आहे. आजही मी त्यांची भेट घेतली.' 

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र आघाडी आहे. आमचा पक्ष वेगळा आहे. आता त्यांच्या चर्चेबाबत मी कसे उत्तर देऊ? त्यांच्या बैठकीबाबत मी शरद पवार यांच्याशी काहीही बोललो नाही. चर्चा पुढे सरकरली असेल तर, तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल. राज्यात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट हटवून लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे यावर आमचे एकमत आहे.' सर्वांत शेवटी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Update : तयारीला लागा! जिल्हा परिषद निवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा, राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत

Pune Air Pollution : पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावतेय; महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी

Karnataka : राज्यातील पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

'बसमध्ये पत्नीचा पतीवर चाकू हल्ला'; बार्शी शहरातील धक्कादायक घटना; आई, भावास बेदम मारहाण, नेमकं काय कारण?

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT