three children died due to snake bite at uttar pradesh
three children died due to snake bite at uttar pradesh 
देश

सापाची पुन्हा दहशत; तीन भावांचा मृत्यू

वृत्तसंस्था

सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन भावांचा मृत्यू झाला आहे. बहराईच जिल्ह्यात नागीण तब्बल २६ जणांना डसली असून, सहा जनावरांनाही तिने चावा घेतला आहे. सापाच्या दहशतीमुळे नागरिक गाव सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.

सीतापूर परिसरातील मनिकापूर गावात सुनील यांची तीन मुले घरात झोपली होती. मध्यरात्री आईला रात्री जाग आल्यावर तिन्ही मुले निपचीत पडली होती. मुलांची अवस्था पाहून आईने टाहो फोडला. तिन्ही मुलांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात खासगी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच या मुलांचा मृत्यू झाला होता. शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुलांच्या अचानक जाण्यानं सुनील आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, नाग पंचमीच्या दिवशी नाग मारल्यामुळे संतप्त नागीण आता परिसरातील नागरिकांना डसत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शंकरपूर, चिलबिला, बेलभरिया यासह काही खेड्यांमध्ये सापाने २६ नागरिकांसह सहा जनावरांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थ आपल्या मुलांना नातेवाईकांकडे राहायला पाठवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT