three children died due to snake bite at uttar pradesh 
देश

सापाची पुन्हा दहशत; तीन भावांचा मृत्यू

वृत्तसंस्था

सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन भावांचा मृत्यू झाला आहे. बहराईच जिल्ह्यात नागीण तब्बल २६ जणांना डसली असून, सहा जनावरांनाही तिने चावा घेतला आहे. सापाच्या दहशतीमुळे नागरिक गाव सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.

सीतापूर परिसरातील मनिकापूर गावात सुनील यांची तीन मुले घरात झोपली होती. मध्यरात्री आईला रात्री जाग आल्यावर तिन्ही मुले निपचीत पडली होती. मुलांची अवस्था पाहून आईने टाहो फोडला. तिन्ही मुलांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात खासगी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच या मुलांचा मृत्यू झाला होता. शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुलांच्या अचानक जाण्यानं सुनील आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, नाग पंचमीच्या दिवशी नाग मारल्यामुळे संतप्त नागीण आता परिसरातील नागरिकांना डसत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शंकरपूर, चिलबिला, बेलभरिया यासह काही खेड्यांमध्ये सापाने २६ नागरिकांसह सहा जनावरांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थ आपल्या मुलांना नातेवाईकांकडे राहायला पाठवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

GT vs UPW WPL 2026 : पदार्पणात चमकली अनुष्का, गार्डनरसह जोडल्या १०३ धावा; यूपीची धुलाई करणारी Anushka Sharma कोण?

Nashik Mumbai highway : नाशिक-मुंबई महामार्ग की मृत्यूचा सापळा? वर्षभरात १५९ अपघात, कामाच्या संथ गतीमुळे प्रवासी हैराण

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल

SCROLL FOR NEXT