youth forced by villagers to quarantine in tree at assam 
देश

ग्रामस्थांनी केले झाडावर क्वारंटाईन...

वृत्तसंस्था

गुवाहटी (असाम) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकांनी घरचा रस्ता धरला. प्रवासादरम्यान अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पण, गावात गेल्यानंतरही अनेकांचा त्रास संपलेला दिसत नाही. ग्रामस्थांनी एका युवकाला झाडावर क्वारंटाईन केले असून, संबंधित छायाचित्र व्हायरल झाले आहे.

आमोष बासुमत्री असे क्वारंटाईन केलेल्या युवकाचे नाव आहे. तो तमिळनाडूमधील एका कंपनीत कामाला होता. पण, लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करत तो गावात दाखल झाला. गावात गेल्यानंतर त्याला ग्रामस्थांनी गावात येण्यापासून रोखले. त्याचा कोरोनाचा अहवालही निगेटिव्ह होता. पण, त्याला गावात येऊ दिले नाही. अखेर, त्याला गावाबाहेर क्वारंटाईन होण्यास सांगितले. गावाबाहेर असलेल्या एका झाडावर तो राहू लागला.

आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेच्या जवळ असणाऱ्या गावाच्या बाहेरील बाजूस अंसापूरच्या ग्रामस्थांनी त्याला बांबूच्या झाडावर घर बांधून दिले आहे. त्यावर त्यांनी बासुमात्रीला क्वारंटाईन करून ठेवले. दरम्यान, बासुमात्रीने 'मी ट्री हाऊसमध्ये चार रात्री पूर्ण केल्या आहेत आणि आणखी 10 दिवस येथेच काढायचे आहेत. हे घराइतकेच सोयीचे नसले तरी पुढील 10 दिवस इतर गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी घालविण्यास मी तयार आहे,' असे त्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT