Drinking coconut water every day is beneficial in summer 
फूड

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे!

उन्हाळा आल्यावर शरीराचे संतुलन राखणे गरजेचे असते

सकाळ डिजिटल टीम

Coconut Water Benefits: उन्हाळा आल्यावर शरीराचे संतुलन राखणे गरजेचे असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. या काळात लोकं उष्णता कमी करून शरीर डिहायड्रेट ठेवण्यासाठी विविध प्रकारची पेयं पितात. उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाणारे नारळाचे पाणी (Coconut Water) हे आपल्याला हायड्रेट ठेवते. ते शरीरातील विषारी घटक काढून टाकते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच, त्यात कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे ब्लडप्रेशर आणि हृदयविकारांवरही ते खूप फायदेशीर आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होत असतात. त्यामुळे नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला ६ प्रकारचे फायदे होऊ शकतात.

नारळाचे पाणी (Coconut Water)

होतात हे फायदे

नारळात भरपूर पोषक घटक असतात- नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे आवश्यक घटक असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. हे एक उत्तम अँटी-ऑक्सिडेंट आहे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती टिकून राहते. तसेच सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून आपले संरक्षण होते.

रक्तदाबासाठी चांगले- नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आपले रक्ताभिसरण - रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते. म्हणूनच ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी नारळ पाणी एक चांगला पर्याय आहे.

शरीर हायड्रेटेड ठेवते- नारळाच्या पाण्यात फक्त ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. हे पाणी पौष्टिक आणि शुगर फ्री आहे. त्यामुळे तो कोल्ड-ड्रिंक्ससाठी एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

पचन तंत्र सुधारते- दुसऱ्या पोषक तत्वांशिवाय नारळ पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तसेच पचनसंस्था सुधारते. आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी नारळाचे पाणी खूप फायदेशीर आहे. तसेच हे पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळी संतुलित राहते, ज्यामुळे चयापचय सुधारते. वजन कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते.

नारळाचं पाणी

सांधेदुखीपासून आराम मिळतो- नारळाच्या पाण्यात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे नारळ पाणी प्यायल्याने आपल्या स्नायू आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखी कमी होते.

सकाळी राहता फ्रेश- नारळ-पाणी मॉर्निंग सिकनेस आणि थकवा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे अनेक प्रकारच्या संशोधनात आढळून आले आहे. म्हणूनच काही तज्ञ गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत नारळाचे पाणी पिण्याची शिफारस करतात. या पाण्यामुळे उलट्यांचा त्रास कमी होते. नारळ-पाण्याद्वारे आपल्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा चांगल्या प्रमाणात मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT