camp 
ग्लोबल

१९४४ मध्ये आजच्याच दिवशी ८०० रोमानी मुलांना भयानक पद्धतीने मारण्यात आले होते!

सकाळन्यूजनेटवर्क

आजचा दिवस (१० ऑक्टोंबर) जगाच्या इतिहासात काळादिवस म्हणून नोंदला गेला आहे. आजच्या दिवशी १९४४ साली ८०० रोमानी लहान मुलांची हत्या करण्यात आली होती. यातील काही मुले तर ९ ते १४ वर्षे वयाची होती. हिटलरचा राक्षसीपणा आपणाला माहिती आहे, पण ही घटना खूप कमी लोकांना माहिती असेल. 

हिटलरच्या निर्दयीपणाचे केंद्र होते, पोलंडमधील ऑश्वित्ज. नाझी सरकारच्या काळात ऑश्वित्ज सर्वात मोठे नजरबंदी कॅम्प होते. नाझीचे अधिकारी गुप्त पद्धतीने यूरोपातील ज्यू लोकांना पकडून येथे आणायचे. यातील अनेक लोकांना कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर गॅस चेंबरमध्ये टाकून मारले जात असे. अनेकांना मरणाची वाट पाहावी लागत असे. कॅम्पमध्ये आलेल्या ज्यूंचे केस कापले जायचे, त्यानंतर अंगावरील कपडे काढून त्यांना चिंध्या घालण्यासाठी दिल्या जायच्या. 

ऑश्वित्ज कॅम्पांचे एक समुह होते, ज्यांना १,२,३ असे नाव देण्यात आले होते. याठिकाणी ४० छोटे कॅम्प सुद्धा होते, यांना ऑश्वित्ज द्वितीय असं म्हटलं जायचं. नाझीच्या एसएस एजेंसीने याठिकाणी मृत्यूची सारी तयारी करुन ठेवली होती. अत्यंत भयानक मृत्यू देण्याचे सर्व मार्ग याठिकाणी अवलंबले जायचे. ३०० तुरुंग खोल्या, चार बाथरुम, भट्टी, शव ठेवण्यासाठी गोदाम असं सर्व काही येथे होते. हजारो ज्यू नागरिकांना वैद्यकीय प्रयोगांसाठी येथे वापरलं जायचं. हा कॅम्प जोसेफ मेंजलच्या देखरेखेखाली चालायचा. 

महिलांनी पुरवली स्टोटके

७ ऑक्टोंबर १९४४ साली एक छोटे बंड झाले होते,  ज्यू कैद्यांना शवांना गॅस चेंबरपासून भट्टीपर्यंत घेऊन जाण्यास जबरदस्ती केली जात होती. यावेळी संतापलेल्या काही लोकांनी विस्फोटकांचा वापर करत गॅस चेंबर उडवले होते आणि दुसऱ्या एका गॅस चेंबरला आग लावली होती. या विस्फोटकांची ज्यू महिलांच्या साह्याने तस्करी करण्यात आली होती. त्या जवळच्याच एक शस्त्र कारखाण्यात काम करत होत्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे रोहित पवारांना 'शाब्दिक टोले'

बंडामध्ये सामिल असलेल्या ४५० पैकी २५० कैदी गोंधळादरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या सर्वांना पुढे पकडण्यात आले आणि गोळ्या घालण्यात आल्या. नंतर १० ऑक्टोंबर रोजी ८०० रोमानी मुलांना गॅस चेंबरमध्ये टाकून मारण्यात आले होते. 

हिटलरच्या काळात रोमानी लोकांवर क्रूर अत्याचार करण्यात आले होते. जवळजवळ १५ लाख रोमानी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. १९५० मध्ये रोमानी लोकांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, जर्मन सरकारने त्यांना कोणतीही मदत दिली नाही. वंशवादामुळे नाही, तर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना मारण्यात आले होते, असे स्पष्टीकरण जर्मन सरकारकडून देण्यात आले होते. 

(edited by- kartik pujari) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT