ग्लोबल

भारताने सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल- चीनची पुन्हा धमकी

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने डोकलाम येथून आपलं सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल. एवढंच नव्हे तर चीनने हा शेवटचा इशारा म्हटलं आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकाने व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा प्रसारित केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्ली सर्वांत वाईट दिवसांची तयारी करत आहे. सुरक्षा संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरी माहिती देत नाहीत. त्या मोदींना अंधारात ठेवत आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये जी चूक केली होती तीच चूक भारत आज पुन्हा करत आहे, असे या व्हिडिओमध्ये ग्लोबल टाइम्सचे संपादक हू जिजिन यांनी 1962 च्या युद्धाचा संदर्भ देऊन म्हटले आहे. चीनने प्रथमच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन युद्धाची धमकी दिली आहे. सुरक्षा संस्था आपल्या क्षमतांबद्दल मोदी यांना अंधारात ठेवत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT