pakistan 16 year old sikh girl was abducted and converted muslim 
ग्लोबल

पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...

वृत्तसंस्था

कराची (पाकिस्तान): एका सोळा वर्षीय शीख युवतीचे अपहरण करून तिच्या मनाविरोधात धर्मांतर करून एका मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिल्याची घटना येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

युवतीच्या नातेवाईकांनी सांगितले की, लक्ष्मी कौर (वय 16) हिचे जाकोबाबाद येथून 17 जून रोजी अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर तिचे मनाविरोधात धर्मांतर केले. धर्मांतरानंतर तिचे वझिर हुसैन चांदियो या मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिला. याबाबत तक्रार दाखल केली आहे. अपहरण करणाऱयांना आणि वझिरला शिक्षा होण्याची मागणी करण्याबरोबरच या घटनेचा शीख नागरिकांनी निषेध केला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या शीख नागरिकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासातील दोन भारतीय अधिकाऱयांचे अपहरण केले होते. दोघांची 50 तासानंतर सुटका करण्यात आली होती. मात्र, 50 तासांमध्ये त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात होता. त्याबाबत भारताने वारंवार पाकिस्तानकडे सूचना मांडल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानने उलट भारतीय कर्मचाऱ्यांना 'हिट अँड रन' प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. सुटका झाल्यानंतर दोन्ही अधिकार भारतात परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT