Guava
Guava 
health-fitness-wellness

सफरचंदापेक्षा पेरू लयभारी; सी व्हिटॅमिनचा मोठा स्त्रोत, पचनक्रिया सुधारण्यास महत्त्वाचे फळ

मधुकर कांबळे

औरंगाबाद : पाणथळ जमीन वगळता कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या पेरू फळपिकात गुणधर्मांच्या बाबतीत सफरचंदालाही मागे टाकण्याची क्षमता आहे. पेरूची घनलागवड फायदेशीर ठरेल असे मत हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले. एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली यांच्यावतीने तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१२) पहिल्या दिवशी ‘ पेरू लागवड तंत्रज्ञान ' या विषयाने वेबसंवादाला सुरूवात झाली.

पहिल्या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हिमातयबाग येथील फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी पेरू लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाले, पेरू हे समशितोष्ण हवामानात येणारे महत्त्वाचे फळपीक आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे मृग बहारातील हे फळपिक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत सफरचंदालाही मागे टाकण्याची क्षमता पेरूमध्ये आहे.

मात्र सर्दी होते म्हणून या फळाला बदनाम करण्यात आले आहे. सी व्हिटॅमिनचा सर्वात मोठा स्त्रोत पेरू आहे. पचनक्रिया सुधारण्यास पेरू खूप महत्वाचे फळ आहे. तंतुमयता, उष्मांक, कॅलशियम, लोह या फळपीकांतुन मुबलक मिळते. या पीकाची घनलागवड सर्वात जास्त यशस्वी फळपीक सिद्ध झाले असून त्याची शेतकऱ्यांनी लागवड करावी असे मत व्यक्त केले. सिकंदर जाधव, राजेंद्र शेटे यांनी फळपीकाविषयीचे अनुभव कथन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ काकासाहेब सुकासे यांनी प्रास्ताविक केले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT