Agriculture Department esakal
जळगाव

Jalgaon News : पावसाअभावी उडीद, मुगाचा पेरा घटणार : कृषी विभाग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जून महिन्याचे २० दिवस उलटले, तरी जिल्ह्यात अद्याप मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. परिणामी, उडीद, मुगाच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे या पिकांचा पेरा घटणार आहे. मात्र तूर, बाजरीची पेरणी जुलैअखेरपर्यंत केली तरी त्याचे उत्पादन चांगले येईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कडक उन्हाळा होता. त्यामुळे मॉन्सूनही लांबला. मॉन्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची चिन्हे असतानाच बिपरजॉय वादळाचा फटका मॉन्सूनला बसला. एरवी मृग नक्षत्रावर आगमन होणाऱ्या मॉन्सूनचे अद्यापही आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.(Due to lack of rain sowing of Udid Muga will decrease Agriculture Department Sowing of tur millets continue till end of July Jalgaon News)

जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू होताच मॉन्सूनचे आगमन होते. शेतकरी पेरण्यांना लागतात. यंदा मात्र तसे झालेले नाही. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचा परिणाम मूग, उडीदच्या पेरण्यांवर झाला आहे. अद्याप या पेरण्या न झाल्याने उत्पादनात घट येणार आहे. केव्हा एकदाचा पाऊस पडेल अन्‌ पेरण्या करू, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सात लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेपाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा होतो.

बागायतदार शेतकऱ्यांनी ४६ टक्के कापसाच्या पेरण्या केल्या आहेत. त्यांच्याकडील विहिरींना पाणी असल्याने त्यांनी कापसाला पाणी देणे सुरू केले आहे. दुसरीकडे मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच पाऊस पडावा, यासाठी वरुणराजाला साकडे घातले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"जिल्ह्यात कोरडवाहू पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. बागायतदारांनी मात्र कापसाच्या पेरण्या केल्या आहेत. कोरडवाहू शेतकरी जुलैअखेरपर्यंत तूर, बाजरीचा पेरा करून चांगले उत्पादन घेऊ शकतात. २५ जून ते १० जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

२४ पासून जिल्ह्यात पाऊस

जिल्ह्यात २४ पासून जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र पाऊस कोठे पडेल, कोठे पडणार नाही. २४ जून ते २ जुलैदरम्यान होणारा पाऊस पडलेली तूट भरून काढण्याची शक्यता आहे. आता बिपरजॉय वादळाचे संकट टळले आहे. मॉन्सूनच्या आगमनाला त्याचा अडथळा होता. तो आता दूर झाला आहे, असे हवामान अभ्यास नीलेश गोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT