Thousands of farmers deprived of heavy rainfall fund jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : ‘ई-केवायसी’नंतरही शेतकऱ्यांना पैसा मिळेना; पारोळा तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित

संजय पाटील

Jalgaon News : गेल्या खरीप हंगामात (२०२२) सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. बऱ्याच गरजू शेतकऱ्यांनी हात उसनवारी व काहींनी बँकांचे कर्ज काढून आपल्या शेतीत पैसा ओतला.

मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा पाण्यात गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शेतकरी संघटनांनी शासनाकडे मागणी लावून धरली. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्यात सर्वात जास्त पारोळा तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मंजूर झाला. (Thousands of farmers deprived of heavy rainfall fund jalgaon news)

यात तब्बल ५८ हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करण्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन अंगठा ठेवून ई केवायसी केली.

त्यानुसार चाळीस हजारांच्या वर शेतकऱ्यांना मदतीचा लाभ झाला. मात्र यातील उर्वरित शेतकऱ्यांनी मागील ऑगस्ट महिन्यात यादीत नाव आल्यानुसार सेतू केंद्रात ई केवायसी केली. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, शासनाकडून यादी येणे, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे, तसेच शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करणे, एवढेच काम ‘महसूल’चे आहे. मात्र शेतकऱ्यांना मदतीच्या निधीबाबत महसूल विभागालाच दोष देत त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही मदत शासनाकडून मिळणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार प्रमाणीकरण केले असेल व सेतू केंद्रात ई केवायसी केली असेल, अशा शेतकऱ्यांना तो लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे. त्यांनी बँकेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे तसेच तेथील केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, एवढीच अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

"गेल्या दोन महिन्यांपासून मी आपले सरकार केंद्रात ई-केवायसी केली आहे. मात्र माझ्या खात्यावर अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या खात्यावर रक्कम जमा करावी, ही विनंती." - सुभाष पाटील, शेतकरी, पारोळा शिवार

"तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आले आहे, अशा खातेधारक शेतकऱ्यांनी बँकेत आधार लिंक करणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे दहा वर्ष जुने आधार कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांनी आधार केंद्रात जाऊन आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे." - डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT