konkan political news 
कोकण

Politics : सामतांकडून कदमांची पाठराखण; 'रामदासभाईंनी सेनेसाठी तुरुंगवास भोगलाय ते दुःख महत्त्वाचं'

आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन; सेनेचा ५२ वर्षांचा मांडला अनुभव

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी - रामदास भाई यांनी शिवसेनेसाठी प्रसंगी तुरुंगवासही भोगलेला आहे. त्यांनी जे दुःख व्यक्त केलं, ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी व्यक्त करत माजी मंत्री रामदास कदम यांची पाठराखण केली आहे.
रत्नागिरी येथील पाली निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कदम यांच्यावर होत असलेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले, रामदासभाईंनी १९७८ मध्ये शिवसेनेच्या काही गोष्टींसाठी तुरुंगवास भोगलेला आहे. त्यानंतर ते खेडमध्ये आले. पाच ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना वाढवली. कोल्हापूरचे पालकमंत्री होते, संभाजीनगरमध्ये शिवसेना पक्ष वाढविला. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांची चांगली पकड होती. एकवेळी रत्नागिरीची जिल्हा परिषद शिवसेनेकडून जाईल असे वातावरण होते. त्या परिस्थितीत रामदासभाईंनी शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी काम केले.

स्वतःचा खर्च करून पक्ष वाढविण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते. बावन्न वर्षांचा अनुभव असलेल्या शिवसैनिकाने आपला अनुभव मांडला. तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत २०० ऐवजी १८१ मतं कशी मिळाली यावर बोलण्यापेक्षा सभागृहात १०९ ची ९८ मतं कशी झाली याचा विचार करावा असे सांगत आमदार सामंत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शिंदे गटासंदर्भात ते म्हणाले, आम्ही अजुनही शिवसेनेतच आहोत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्यासाठी काम करत आहोत. आम्ही बंडखोरी केलेली नाही.

आमदार जाधवांशी चर्चा करेन

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील निर्णयाला स्थगिती दिल्यावरुन आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार उदय सामंत म्हणाले की, भास्कर जाधव हे आमचे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत, माझ्या खात्याबाबतच्या निर्णयांना कुठेही स्थगिती नाही. मात्र तरी देखील स्वतः भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करेन, त्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, शेवटी ते विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT