INDW vs AUSW esakal
क्रीडा

INDW vs AUSW : गार्डनेरने भारताच्या तोंडचा घास पळवला; पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

सकाळ डिजिटल टीम

Birmingham Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या महिला क्रिकेट टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सनी पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 षटकात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्लेघ गार्डनेरने नाबाद 52 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिला 20 चेंडूत 37 धावा करून ग्रेस हॅरिसने चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंहने 4 तर दिप्ती शर्माने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.

भारताने ठेवलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. भारताच्या रेणुका सिंहने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उडवली. तिने अॅलिसा हेले (0), मेघ लेनिंग(8), बेथ मूनी (10), ताहलिया मॅग्राथ(14) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दिप्ती शर्माने रिचेल हायनेसला 8 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच पाचवा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 49 धावा झाली असताना ग्रेस हॅरिसने अॅश्लेघ गार्डनेरच्या साथीने संघाला 12 षटकात 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र मेघना सिंहने 20 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या ग्रेस हॅरिसला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जेस जोनासेन देखील 3 धावांची भर घालून माघारी परतली.

दुसऱ्या बाजूने अॅश्लेघ गार्डनेरने आक्रमक फलंदाजी करत झपाट्याने धावा केल्या. तिला अॅना किंगने 16 चेंडूत 18 धावा करत चांगली साथ दिली. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 47 धावांची नाबाद भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला 19 व्या षटकात विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या टी 20 क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला संघात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मृती मानधना 24 धावा करून बाद झाली.

यानंतर शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत संघाला अर्धशतक पार करून दिले. मात्र यस्तिकाने 8 धावा करून तिची साथ सोडली. 33 चेंडूत 9 चौकारांसह 48 धावा करणाऱ्या शेफाली वर्माला जोनासेनने बाद केले. यामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला.

जोनासेनने भारताला पाठोपाठ धक्के देत भारताची अवस्था 5 बाद 115 धावा अशी केली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतकी खेळी करत भारताला 150 टप्पा पार करून दिला. कौरने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोरावर भारताने 20 षटकात 8 बाद 154 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे आव्हान ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, तुमच्या शहरात काय आहे ताजा भाव? जाणून घ्या

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

एक्स गर्लफ्रेंडला अमेरिकेत संपवलं, पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् तरुण भारतात परतला

Sangli Crime : चारित्र्याच्या संशयावरून युपीतून मिरजेत आणून पती-सासऱ्याने केला महिलेचा खून; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, मिरजच का निवडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची पाऊले परतीच्या वाटेवर! राज्यात कसं असेल तापमान?

SCROLL FOR NEXT