Virat-Kohli 
क्रीडा

Video : कॅप्टन कोहली म्हणाला, 'टी-20 वर्ल्डकप जिंकायचाय, तर...'

वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. गेल्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झालेला पराभव सोडता उर्वरित सामन्यांत आणि मालिकांमध्ये भारतीय संघाने विजयी पताका फडकवली आहे. मात्र, आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये किंग कोहलीची 'टीम इंडिया' अपयशी ठरत आहे. 

2020 या वर्षातही भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज आहे. यंदा होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकासाठी संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार असल्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष्य दिले जात आहे. त्यामुळे कॅप्टन कोहलीनेही संघ सहकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. 

विराटसेना श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी विराटने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, 'सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देऊ शकेल, अशा खेळाडूच्या शोधात सध्या आम्ही आहोत. आणि अशा खेळाडूची संघाला गरज आहे. फक्त दोन-तीन चांगले फलंदाज आहेत, म्हणून प्रत्येक सामना तुम्ही जिंकू शकणार नाही. आणि आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा तर मुळीच नाही. त्यामुळे संघातील तरुण खेळाडूंनी तळात आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यांच्याकडूनही अशाच अपेक्षा आहेत.' 

तो पुढे म्हणाला, 'सध्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर जास्त लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे. आणि संघाची बांधणीही अशाच प्रकारे करण्यात आली आहे. तुम्ही एक टीम म्हणून प्रत्येक सामना खेळावा, अशाच प्रकारचे वातावरण आम्ही तयार केले आहे.' 

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघाला बोटावर मोजण्याइतकेच सराव सामने खेळता येणार आहेत. खेळाडूंची दुखापत यासारखे अनेक प्रश्न हे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला टीम इंडिया कशी सामोरे जातेय, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष्य लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT