2011 wc 
क्रीडा

आता हे काय नवीन; म्हणे 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स होता.. वाचा कोणी केलाय हा आरोप...

सकाळवृत्तसेवा

कोलंबो : मुंबई येथे झालेला 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत 1983 नंतर प्रथमच विश्वकरंडक जिंकण्याची किमया केली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली होती. मात्र हा अंतिम सामना आमच्या संघाने भारताला विकला होता, असा आरोप श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी केला आहे.

महिंदनंदा अलुतगमांगे यांनी हा आरोप केला आहे. महिंदनंदा 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात आमच्या संघाने जाणीवपूर्वक हार स्विकारली, असे महिंदनंदा यांनी सिरासा टिव्हीला मुलाखत देताना सांगितले.

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

आपण हे अतिशय जबाबदारीने विधान करत असल्याचे महिंदनंदा म्हणतात; परंतु आपल्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचेही ते म्हणतात. देशहितासाठी मला अधिक खोलवर जायचे नाही; परंतु भारताविरुद्धचा अंतिम सामना आम्ही जिंकायला हवा होता, असे त्यांनी सांगितले.

त्या जाणीवपूर्वक पराभवास खेळाडू जबाबदार नव्हते, तर कोणी तरी बाहेरून हे कृत्य केले, असेही ते म्हणतात, पण नेमका कोणाचाही उल्लेख केला नाही. वानखेडे स्टेडियमवर झालेला तो अंतिम सामना भारताने 10 चेंडू आणि सहा विकेटने जिंकला होता. श्रीलंकेकडून माहेला जयवर्धनेने नाबाद 103 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेने 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. भारताकडून गौतम गंभीरने 97 तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Mumbai News: सहा महिने पोटदुखी, पण हिमोग्लोबिनची कमतरता मानून दुर्लक्ष; नंतर 21 वर्षीय तरुणीच्या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आलं

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

SCROLL FOR NEXT