Sanju-Samson 
क्रीडा

INDvsSL : पाच वर्षांनी टी-20 खेळणाऱ्या संजूच्या नावावर अनोखा विक्रम!

सकाळ वृत्तसेवा

INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच्या ऐवजी अखेर संजू सॅमसनला संधी मिळाली. 2015 नंतर संजूला थेट शुक्रवारी (ता.10) संधी मिळाली आहे. अशातच त्याच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद झाली आहे. 

संजूने 2015 ते 2020 या कालावधीत भारताकडून सर्वाधिक (73) सामने मिस केले आहेत. संजूने 19 जुलै 2015मध्ये झिंबाव्बेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे होते. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. 

या सामन्यात संजूने 24 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केली होती. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. या सामन्यात त्याचा स्ट्राईकरेट 79.17 होता. 

ट्वेंटी-20 विश्वकरंडक अवघा आठ महिन्यांवर आला असताना भारतीय संघ आता खेळाडूंचे पर्याय तपासून पाहत आहे. पंतला फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश आणि खराब यष्टीरक्षण यामुळे आजच्या सामन्यात संजूला संधी देण्यात आली आहे.

भारताकडून सर्वाधिक टी-20 मिस करणारे खेळाडू :-

संजू सॅमसन - 2015-20 - 73
उमेश यादव - 2012-18 - 65
दिनेश कार्तिक - 2010-17 - 56
महंमद शमी - 2017-19 - 43
रविंद्र जडेजा - 2017-19 - 33

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT