indian cricket team South Africa t20  
IPL

IPL नंतर टीम इंडियामध्ये खेळणार 'हे' धाकड गोलंदाज!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तीन धाकड वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.

Kiran Mahanavar

आयपीएल संपल्यानंतर भारताला 9 ते 19 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तीन धाकड वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. आयपीएल 2022 मध्ये या तीन वेगवान गोलंदाजानी विरोधी संघाच्या फलंदाजांचे बोलती बंद केले आहे. (indian cricket team South Africa t20)

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल 2022 मध्ये तिच्या स्पीडने फलंदाजांना सळोकी पळो करून सोडले आहे. उमरान मलिकने 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम उमरान मलिकच्या नावावर आहे. उमरान मलिकने या हंगामात 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे.

मोहसीन खानने त्याच्या गोलंदाजीने सातत्याने विकेट्स घेत आहे, आणि प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. त्यांनी आयपीएलमध्ये हंगामात एप्रिलच्या उत्तरार्धात पदार्पण केले आहे. मोहसीनने या हंगामात आठ सामने खेळले आहे. त्यामध्ये 6.08 च्या इकॉनॉमी रेटने 10 विकेट घेतले आहेत. मोहसीनवर भारतीय निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे.

आयपीएल 2022 मध्ये डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप पंजाब किंग्ससाठी उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने 13 सामन्यांत 7.82 च्या इकॉनॉमी रेटने दहा विकेट्स घेतल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना त्याचा7.31 चा इकॉनॉमी रेट आहे. जे या टप्प्यातील सर्व गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. त्यामुळे अर्शदीप आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT