Mayank Agarwal sakal
क्रीडा

Team India: अजित आगरकरांची वाढली डोकेदुखी! दीड वर्ष टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूने दिले चोख उत्तर

Kiran Mahanavar

Team India Mayank Agarwal : भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही वर्षांत इतके खेळाडू आले आहेत की आपापसात स्पर्धा वाढत आहे. अशा परिस्थितीत एका सामन्यातील अपयश खेळाडूंसाठी अडचणीचे ठरत आहे. त्याचबरोबर सतत आउट ऑफ फॉर्म राहणे हा सध्या गुन्हा बनला आहे.

अलीकडेच चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी फलंदाजाला संघातून वगळावे लागले. तर गेल्या वर्षी अजिंक्य रहाणेकडून उपकर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर त्याला वगळण्यात आले होते. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 41 पेक्षा जास्त सरासरी असलेला असा आणखी एक खेळाडू आहे. दोन द्विशतकांसह चार शतके झळकावली, पण सध्या तो खेळाडू जवळपास दीड वर्ष संघाबाहेर आहे.

सध्या शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंची उपस्थिती लक्षात घेता या खेळाडूला सध्या तरी पुनरागमन करणे कठीण वाटते. मात्र दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची ताकद दिसून आली आहे. भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालने या सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

मयंकने भारताकडून शेवटचा कसोटी सामना मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो परतलाच नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने त्याने पुनरागमनाचा दावा केला आहे. मयंकची ही कामगिरी टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. केएल राहुल सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्यात आधीच ओपनिंग डिबेट सुरू आहे. अशा स्थितीत आगामी काळात निवड समितीपुढे मोठा पेच निर्माण होऊ शकतो.

मयंक अग्रवालने उत्तर विभागाविरुद्ध उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात 76 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 54 धावा करून दक्षिण विभागाला विजय मिळवून दिला. यासह मयंक अग्रवालच्या संघाने अंतिम फेरी गाठली असून त्यांचा सामना 12 जुलैपासून तारांकित पश्चिम विभागाशी होणार आहे. पश्चिम विभागीय संघात सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, सर्फराज खान असे खेळाडू आहेत. अशा स्थितीत फायनलमध्ये दक्षिण विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे.

मयंक अग्रवालने 2018 साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 2022 पर्यंत भारतासाठी एकूण 21 कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याने 36 डावांमध्ये 1488 धावा केल्या आहेत. मयंकची कसोटीत सरासरी 41 च्या वर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. त्याने कसोटीत दोन द्विशतकेही झळकावली असून 243 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय मयंकने भारतासाठी पाच एकदिवसीय सामने खेळले असून केवळ 86 धावा केल्या आहेत. 2020 पासून तो एकदिवसीय संघात परतला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

SCROLL FOR NEXT