Rohit-Sharma-Hardik-Pandya 
क्रीडा

T20 WC: हार्दिकचा पत्ता कट? रोहितच्या विधानाने चर्चांना उधाण

विराज भागवत

IPL मधून मुंबईचा संघ बाहेर जाताच रोहितचं वक्तव्य

T20 World Cup: IPL 2021मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीत संपला. काही खेळाडूंच्या सातत्याने अपयशी ठरण्यामुळे संघाला त्याचा फटका बसला. त्यातील एक खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. त्याला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतला होता, पण त्याने एकदाही गोलंदाजी केली नाही. कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या सामन्यातनंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबाबत एक असं वक्तव्य केलं की ज्यामुळे त्याचा संघातून पत्ता कट केला जातो की काय अशी एक वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे.

रोहित म्हणाला की हार्दिक पांड्याने IPL मध्ये एकही चेंडू टाकलेला नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे आगामी T20 World Cup साठी तो भारतीय संघात आपले स्थान कायम राखेल की नाही? याबद्दल रोहितने शंका उपस्थित केल्याचे दिसून आले अशी चर्चा आहे. हार्दिक पांड्याने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना आठ चेंडूत १० धावा केल्या. २८ सप्टेंबरला पंजाब किंग्जवर मुंबई इंडियन्सने सहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पांड्याने ३० चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी केली होती; परंतु त्याची गोलंदाजीची तंदुरुस्ती हा विश्वकरंडकाआधी चिंतेचा विषय आहे.

Hardik-Pandya-MI

IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांना मुकल्यानंतर पांड्याने मुंबईसाठी केवळ फलंदाज म्हणून कामगिरी केली. "भारतात झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. दुखापतीतून सावरल्यापासून पांड्याने अजून एकदाही गोलंदाजी केलेली नाही. वैद्यकीय पथक त्याच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीवर काम आहे. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये सुधारणाही होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कदाचित तो गोलंदाजी करण्यास सक्षम होऊ शकतो. फलंदाजीत पांड्याने आत्तापर्यंत निराशा केली असली तरी, आम्हाला त्याच्या गुणवत्तेवर विश्वास आहे", असेही रोहितने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र, हार्दिकने गोलंदाजी केली नाही या वक्तव्यावरून चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Mumbai: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सोपा! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल बांधणार; नवीन मार्ग कसा असणार?

Maharashtra Govt Scheme: आनंदी बातमी! या जोडप्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 1.5–2.5 लाख रुपये; अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

Girish Mahajan : 'हरित नाशिक'साठी ५० हजार वृक्षांचा संकल्प; मंत्री गिरीश महाजन यांची 'होमेथॉन'ला भेट

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT