Shreyas Iyer
Shreyas Iyer  BCCI FB
क्रीडा

श्रेयस अय्यरचं पदार्पणातच दमदार अर्धशतक; शुभमन गिल म्हणतो...

विराज भागवत

पहिल्या दिवसअखेर भारताची धावसंख्या २५०पार

कानपूर: "जेमीसनने चांगला टप्पा दिशा पकडून गोलंदाजी टाकली. त्याचा बाहेर जाणारा चेंडू चांगला जात होता. मधल्या सत्रात ४ प्रमुख फलंदाज बाद झाले असताना श्रेयस अय्यरवर जबाबदारी आली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने खूप समजूतदारपणे फलंदाजी केली. त्याने जाडेजाबरोबर केलेली भागीदारी भारतीय संघाला योग्य जागी घेऊन गेली. जाडेजाचे अर्धशतकानंतर तलवार फिरवणे सगळ्यांनाच आवडते, सगळे त्याची वाट बघत असतात. पण श्रेयसने केलेला खेळ खूपच चांगला होता", अशा शब्दात शुबमन गिलने कसोटी पदार्पणातच अर्धशतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरची पाठ थोपटली.

"मी अर्धशतकानंतर बाद झाल्याचं दु:ख"

श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल दमदार फलंदाजी करत होते. पण शुबमन गिल अर्धशतक झाल्यानंतर ५२ धावांवर बाद झाला. त्याबद्दल बोलताना गिल म्हणाला, "थोड्या कालखंडानंतर मला कसोटी सामना खेळायला मिळाला होता, त्यातून मैदानात प्रेक्षक हजर होते. हे सगळेच मला आनंद आणि प्रेरणा देणारे होते. अर्धशतक करून बाद झाल्याचे मला वाईट वाटले. कारण चांगली फलंदाजी मला जमू लागली होती."

कानपूरला ५ वर्षांनी कसोटी सामना होत आहे. असं असूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ग्रीन पार्क मैदानावर आलेले दिसले नाहीत. पण जे प्रेक्षक मैदानावर हजर होते, त्यांनी भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला. प्रेक्षकांवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे गारुड किती जास्त आहे, याचा सामना बघताना अनुभव आला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नो बॉल टाकल्यानंतर फ्री हिट नाही का? अशा प्रश्नार्थक नजरा पाहायला मिळाल्या.

दरम्यान, पहिल्या दिवसअखेर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५८ धावा केल्या. सलामीवीर मयंक अग्रवाल १३ धावांवर स्वस्तात माघारी परतला. चेतेश्वर पुजारा (२६) आणि अजिंक्य रहाणे (३५) या दोघांना चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यानंतर ५२ धावांवर तोदेखील बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. त्यानंतर पदार्पणाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. दोघांनी आपापली अर्धशतके ठोकत नाबाद ११३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीच्या बळावरच भारताने २५८ धावांपर्यंत मजल मारली.

सेना खासदार म्हणतो आम्ही राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू | Sanjay Jadhav | Shivsena | NCP| Sakal Media

सेना खासदार म्हणतो आम्ही राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू | Sanjay Jadhav | Shivsena | NCP| Sakal Media
परभणी Parbhani: घनसावंगी येथील शिवसेना (Shivsena)मेळाव्यात बोलताना परभणीचे खासदार संजय जाधव (Parbhani MP Sanjay Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)टीका केली. राष्ट्रवादीचा आपल्याला जिल्ह्यात खूप त्रास असल्याचा आरोप करत जीव जायला आल्यावर माकडीन आपल्या पिल्लाला पायाखाली घालते, तेव्हा आम्ही राष्ट्रवादीला (NCP) केव्हाही बुडवू, असा इशाराही जाधव यांनी यावेळी दिला. परभणीच्या जिल्हाधिकारी (Parbhani collector)पदावरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी आपणच जिल्हाधिकाऱ्यांची बदली करू नका, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती, अशी जाहीर कबुलीही दिली.
#Parbhani #shivsena #SanjayJadhav #NCP #Politics

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT