Dhoni-Ganguly 
क्रीडा

धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या वार्षिक करारातून वगळले. त्यानंतर देशभरातील क्रिकेट फॅन्स कमालीचे नाराज झाले आहेत. 

सोशल मीडियावर याबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून असे करण्यामागे काय कारण आहे? असे प्रश्न उपस्थित केले. बीसीसीआयने गुरुवारी (ता.16) वार्षिक करारात सामील करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यावेळी या करारामध्ये धोनीचं नाव वगळण्यात आल्याने त्याच्या रिटारयमेंटची घाई इतरांना झाली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

याबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीला विचारणा केली असता यावर त्याने मौन बाळगले. याप्रकरणी कोणतीही वक्तव्य करणे दादाने टाळले. धोनीला वार्षिक करारातून का वगळले आहे, याबाबत मला काही बोलायचे नाही, असे दादा म्हणाला. 

बीसीसीआयने धोनीला सेंट्रल करारात घेणे टाळले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. गतवर्षीच्या वनडे वर्ल्डकपनंतर धोनीने एकही सामना खेळला नसून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. त्याने भारतीय सैन्यदलात काही दिवस सेवा बजावली. 

बीसीसीआयने धोनीला ज्या करारातून वगळले आहे तो करार सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 पर्यंतचा आहे. धोनीने सप्टेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मात्र, या वर्षी होणारा टी-20 वर्ल्डकप तो खेळू शकतो. हा वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे धोनी बीसीसीआयच्या आगामी करारासाठी उपलब्ध असेल आणि तो वर्ल्डकप खेळण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT