social media sakal
लाइफस्टाइल

Social Media: शंभरापैकी ८० लग्न मोडण्यामागे सोशल मीडिया; वाचा काय आहे प्रकरण

सोशल मीडियाचा सर्वात जास्त दुष्परिणाम वैवाहीक आयुष्यावर पडलाय.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय पण आपली माणसं दुरावली आहेत. आपल्या आजुबाजूला बसणाऱ्या लोकांसाठी या सोशल मीडियाच्या जगात आपल्याकडे वेळच नाही. सोशल मीडियाचा सर्वात जास्त दुष्परिणाम वैवाहीक आयुष्यावर पडलाय.

गेल्या सहा महिन्यांमध्ये नवरा बायकोच्या वादावरुन ट्रस्ट सेलकडे १३०० च्यावर तक्रारी आल्या असून त्यातील ८० टक्के तक्रारीमागे सोशल मीडिया कारणीभूत आहे.

नवरा बायकोच्या वादाचं बहुताशं कारण हे मोबाईल आहे, त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की जेव्हापासून माणसाच्या आयुष्यात मोबाईल आला तेव्हापासून अनेक नाते, लोक माणसापासून दुरावले आहे.

या तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणे, मोबाईल जास्त वेळ वापरणे अशी शुल्लक कारणे आहेत. सुरवातीला हुंडा, घरगुती हिंसाचार यामुळे घटस्फोट होत असे तर आता या सोशल मीडियामुळे.

trust सेलकडे नवरा बायको यांच्यातील वाद प्रकरणी तक्रार आल्यानंतर ते या तक्रारी समुपदेशाद्वारे निकाली काढतात मात्र काही वाद-प्रकरण मार्गी निघत नाही, अशावेळी शेवटी गुन्हा दाखल केला जातो.

या तक्रारी कशा प्रकारच्या असतात?

  • जुन्या मित्र-मैत्रिणीसोबत मोबाईलवर बोलणे

  • मोबाईलवर टाईम पास करणे.

  • मित्र मैत्रीणींसोबत चॅटिंग करणे.

  • सतत फोन वापरत असल्याने अनैतिक संबंध असल्याचा दोघांमध्ये संशय असणे

  • सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यावरुन मतभेद होणे

  • पार्टनर समोर असतानाही मोबाईल वापरत राहणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT